शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

संचारबंदी आहे; मात्र केवळ कागदावरच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:13 IST

राज्य सरकारच्या वतीने संचारबंदी आदेश दिवस-रात्र लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तालयाकडूनही या आदेशानुसार स्पष्टपणे स्थानिक ...

राज्य सरकारच्या वतीने संचारबंदी आदेश दिवस-रात्र लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तालयाकडूनही या आदेशानुसार स्पष्टपणे स्थानिक पातळीवर कलम-१४४ आदेशाची अधिसूचना काढण्यात आली. या आदेशामध्ये केवळ अतिअत्यावश्यक वैद्यकीय कारणांचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही कारणांनी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व त्यासंबंधित कर्मचारी वर्ग वगळता अन्य कोणीही रस्त्यांवर येऊ नये, असे म्हटले आहे. मात्र, शहरात याउलटच चित्र गुरुवारी दिवसभर पहावयास मिळाले.

बुधवारी रात्रीपासून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘फिक्स पॉइंट’ लावून नाकाबंदी केली जात होती, ते नाकेही गुरुवारी दिवसभर ओस पडल्याचे चित्र होते. बहुतांश नाक्यांवर तर बॅरिकेडदेखील अस्ताव्यस्त झाल्याचे पहावयास मिळाले. काही नाक्यांवरून पोलीस कर्मचारीही गायब झालेले हाेते तर ज्या ठिकाणी कर्मचारी होते, ते एका बाजूला बसून मोबाईलवर मग्न असल्याचे दिसून आले. शहर व परिसरात पोलीस गस्त गुरुवारी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत काहीशी ‘चोख’ पहावयास मिळाली, मात्र त्यानंतर गस्त अन‌् नाकाबंदीही ढेपाळल्याची स्थिती होती.

---इन्फो--

सिग्नलवर वाहनांची गर्दी

शहरात सर्वत्र नागरिकांची रेलचेल कायम असल्यामुळे संचारबंदी असतानाही शहरातील सिग्नलवर वाहनांची गर्दी दिसून आली. यामुळे संचारबंदी कायद्याचे पालन काटेकोरपणे नागरिकांकडून करण्यात येत नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. बहुतांश लोक रस्त्यावर वावरत असल्यामुळे संचारबंदी आहे तरी कोठे? असाच प्रश्न अनेकांना पडला.

---इन्फो--

बाहेर पडलेल्यांची कारणे अशी...

भाजीपाला,फळे घेण्यासाठी चाललो.

किराणा माल आणायला जात आहे.

औषधी घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेलो होतो.

दवाखान्यात तपासणीसाठी चाललो.