शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चे २१ बळी

By admin | Updated: April 2, 2017 01:44 IST

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या म्हसरूळ येथील बाळासाहेब माधव जाधव (५८) यांचा शनिवारी (दि़१) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जिल्ह्यातील स्वाइन फ्लू बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे़ शहर व जिल्ह्यात अशा दोन्ही ठिकाणी स्वाइन फ्लूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ शनिवारी (दि़१) पर्यंत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सहा, तर महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये ३१ अशा ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ गत तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व महापालिका हद्दीतील ४ हजार ४१४ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले़ त्यामध्ये ३९८ संशयितांना त्वरित टॅमी फ्लूची औषधे देण्यात आली़ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत २१ नागरिकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळासाहेब जाधव यांचा तपासणी अहवाल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळालेला नाही़ (प्रतिनिधी)‘इन्फल्युएंझा ए किंवा बी’ नामक वायरसमुळे जेव्हा सर्दी-ताप-अंगदुखी अशी लक्षणं येतात तेव्हा त्या आजाराला वैद्यकीय परिभाषेत ‘फ्लू’ असं संबोधतात़ मुळात स्वाइन फ्लू हा श्वसनाचा आजार ‘इन्फल्युएंझा ए नामक’ वायरस श्वसनमार्गाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. सर्वात प्रथम या वायरसचा प्रादुर्भाव २००९ साली मेक्सिको येथे आढळून आला.या वायरसच्या पृष्ठभागावर दोन महत्त्वाचे अँटिजिन्स असतात. अँटिजीन्स म्हणजे अँटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ. यास सरफेस अँटीजन असे म्हणतात. .स्वाइन फ्लूची सुरुवातीची लक्षणे ही साध्या तापाप्रमाणेच असतात. मात्र तापाचे प्रमाण तसेच घशातील संसर्गाचे प्रमाण वाढले तर ओसेल्टामिव्हीर सुरू करता येईल. प्रत्येक वेळी चाचणी करण्याची तसेच त्याच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी वेळीच उपचार करणे अधिक योग्य आहे. स्वाइन फ्लू आणि साध्या तापामधील फरक ओळखणे कठीण असल्याने काही वेळेला योग्य उपचाराविना रुग्णांची स्थिती गंभीर होते, असे निदर्शनास येते. मात्र स्वाइन फ्लूच्या चाचणीची वाट न पाहता लक्षणांवरून उपचार सुरू केले तर स्वाइन फ्लू हा प्राणघातक ठरणार नाही. या आजारावर आॅसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत.

विषाणू राहतात हवेत आठ तास जिवंत

स्वाइन फ्लूचे विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतो. या व्यक्तीच्या खोकण्याने, शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरूपात जिवंत राहतात. तसेच हे विषाणू खुर्ची, टेबलसारख्या ठिकाणीही जिवंत राहतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यांसारख्या घाणेंद्रियांशी संपर्क आल्यास संक्रमण होते.