शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चे २१ बळी

By admin | Updated: April 2, 2017 01:44 IST

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गत तीन महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या म्हसरूळ येथील बाळासाहेब माधव जाधव (५८) यांचा शनिवारी (दि़१) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जिल्ह्यातील स्वाइन फ्लू बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे़ शहर व जिल्ह्यात अशा दोन्ही ठिकाणी स्वाइन फ्लूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ शनिवारी (दि़१) पर्यंत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सहा, तर महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये ३१ अशा ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ गत तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व महापालिका हद्दीतील ४ हजार ४१४ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले़ त्यामध्ये ३९८ संशयितांना त्वरित टॅमी फ्लूची औषधे देण्यात आली़ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत २१ नागरिकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळासाहेब जाधव यांचा तपासणी अहवाल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळालेला नाही़ (प्रतिनिधी)‘इन्फल्युएंझा ए किंवा बी’ नामक वायरसमुळे जेव्हा सर्दी-ताप-अंगदुखी अशी लक्षणं येतात तेव्हा त्या आजाराला वैद्यकीय परिभाषेत ‘फ्लू’ असं संबोधतात़ मुळात स्वाइन फ्लू हा श्वसनाचा आजार ‘इन्फल्युएंझा ए नामक’ वायरस श्वसनमार्गाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. सर्वात प्रथम या वायरसचा प्रादुर्भाव २००९ साली मेक्सिको येथे आढळून आला.या वायरसच्या पृष्ठभागावर दोन महत्त्वाचे अँटिजिन्स असतात. अँटिजीन्स म्हणजे अँटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ. यास सरफेस अँटीजन असे म्हणतात. .स्वाइन फ्लूची सुरुवातीची लक्षणे ही साध्या तापाप्रमाणेच असतात. मात्र तापाचे प्रमाण तसेच घशातील संसर्गाचे प्रमाण वाढले तर ओसेल्टामिव्हीर सुरू करता येईल. प्रत्येक वेळी चाचणी करण्याची तसेच त्याच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी वेळीच उपचार करणे अधिक योग्य आहे. स्वाइन फ्लू आणि साध्या तापामधील फरक ओळखणे कठीण असल्याने काही वेळेला योग्य उपचाराविना रुग्णांची स्थिती गंभीर होते, असे निदर्शनास येते. मात्र स्वाइन फ्लूच्या चाचणीची वाट न पाहता लक्षणांवरून उपचार सुरू केले तर स्वाइन फ्लू हा प्राणघातक ठरणार नाही. या आजारावर आॅसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत.

विषाणू राहतात हवेत आठ तास जिवंत

स्वाइन फ्लूचे विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतो. या व्यक्तीच्या खोकण्याने, शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरूपात जिवंत राहतात. तसेच हे विषाणू खुर्ची, टेबलसारख्या ठिकाणीही जिवंत राहतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यांसारख्या घाणेंद्रियांशी संपर्क आल्यास संक्रमण होते.