शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

By admin | Updated: August 15, 2014 00:53 IST

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

 

  प्रतिनिधी नाशिक, दि. १४ : १५ आॅगस्ट हा आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक अभिमानाचा दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती तरी स्वातंत्र्य-सैनिकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. परंतु अलीकडे हा दिवस उत्साहात, आनंदात साजरा करणे हळूहळू बंद होत आहे, याउलट एक सुट्टीचा दिवस म्हणून बरेचदा त्याकडे पहिले जात असल्याने आपण स्वातंत्र्यप्रती किती गांभीर्य बाळगुण आहोत, असा विचार करणे गरजेचे असल्याचे तरुणांनी सांगितले. देशाची सद्यस्थिती पाहता चांगल्या बाबींपेक्षा वाईट प्रवृत्तींनाच अधिक पाठबळ दिले जाते. भ्रष्टाचार कमी करण्याऐवजी तो वाढतच असल्याने देशाची प्रगती नव्हे तर अधोगती होत असल्याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे देशाची परिस्थिती बदलायला हवी. अन्यथा पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे तरुणांनी सांगितले. नव्या पिढीची ताकदनवी पिढी विचार करणारी असून जी पिढी स्वत:च्या उत्कर्षासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आपला आयुष्य उभारतात त्या पिढी कडून हा देश ही घडण्याची अपेक्षा आहे. कुठलाही देश एका रात्रीत उभा राहत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घ्यावी लागते, भारतात तर महापुरूषांनी यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे गरज आहे फक्त त्यांच्या विचारांची कास धरून नवे पाऊल उचलण्याची. त्यासाठी संगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न छोटा आहे किंवा मोठा आहे याचा फारसा विचार न करता प्रयत्न करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणाला हे करणे शक्य नाही, हा दुर्बल विचार मनातून काढून टाकण्याची गरज असल्याचे अमित निकुंभ यांनी सांगितले. महापुरूषांच्या विचाराची व्हावी आठवणसुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारे आम्ही एवढे निष्प्राण, निस्तेज कसे? कधी ऐकू येणार ती आरोळी, भारत माता की म्हंटल की कधी सबंध देश एका आवाजात ‘जय’ चा उदघोष करणार? प्रत्येकाने आपल्या लहानपणी पाहिलेले भारत देशाचे स्वप्न कधी साकार होणार? ज्या महापुरु षांची भाषणे आम्ही द्यायचो, ऐकायचो कधी त्यांच्या विचारांना आम्ही आमच्या जीवनात खरं स्थान देणार आहोत काय? कित्येक स्वातंत्र्य दिन आले, येतील आणि जातील पण त्या सुंदर देशाचे स्वप्न साकार करण्याचा बदल प्रत्यक्षात येईल काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असल्याने आपल्याला पुन्हा महापुरूषांच्या विचाराची आठवण व्हायला हवी असे प्रशांत दिक्षीत यांनी सांगितले. निवडणुका म्हणजे राष्ट्रीय सणनिवडणुका म्हणजे आमच्या देशात राष्ट्रीय सनासारख्या झाल्या आहेत, दर वर्षांनी, महिन्यांनी कसली न कसली निवडणूक घ्यायची, लोकांच्या कल्याणाची भाषा करायची, आम्ही ही ती ऐकायची आणि टाळ्या वाजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तेच ते चालू आहे, १ नाही २ नव्हे तर तब्बल गेल्या ६५ वर्षापासून ही पद्धत सुरू आहे. स्वतंत्र भारतात तीन पिढ्या बदलल्या पण आमच्या समस्या त्याच होत्या आणि आज ही त्याच आहेत; किंबहुना त्या समस्यांनी आता महाकाय स्वरूप घेतलं आहे. देश तर स्वतंत्र झाला, पण आम्ही अजून ही गुलामच राहिलो. स्वत:च्या स्वातंत्र्य साठी स्वत:लाच लढावे लागते, पण लढणे म्हणजे काय हेच आता आम्ही विसरलो असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.