शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

By admin | Updated: August 15, 2014 00:53 IST

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

 

  प्रतिनिधी नाशिक, दि. १४ : १५ आॅगस्ट हा आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक अभिमानाचा दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती तरी स्वातंत्र्य-सैनिकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. परंतु अलीकडे हा दिवस उत्साहात, आनंदात साजरा करणे हळूहळू बंद होत आहे, याउलट एक सुट्टीचा दिवस म्हणून बरेचदा त्याकडे पहिले जात असल्याने आपण स्वातंत्र्यप्रती किती गांभीर्य बाळगुण आहोत, असा विचार करणे गरजेचे असल्याचे तरुणांनी सांगितले. देशाची सद्यस्थिती पाहता चांगल्या बाबींपेक्षा वाईट प्रवृत्तींनाच अधिक पाठबळ दिले जाते. भ्रष्टाचार कमी करण्याऐवजी तो वाढतच असल्याने देशाची प्रगती नव्हे तर अधोगती होत असल्याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे देशाची परिस्थिती बदलायला हवी. अन्यथा पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे तरुणांनी सांगितले. नव्या पिढीची ताकदनवी पिढी विचार करणारी असून जी पिढी स्वत:च्या उत्कर्षासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आपला आयुष्य उभारतात त्या पिढी कडून हा देश ही घडण्याची अपेक्षा आहे. कुठलाही देश एका रात्रीत उभा राहत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घ्यावी लागते, भारतात तर महापुरूषांनी यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे गरज आहे फक्त त्यांच्या विचारांची कास धरून नवे पाऊल उचलण्याची. त्यासाठी संगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न छोटा आहे किंवा मोठा आहे याचा फारसा विचार न करता प्रयत्न करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणाला हे करणे शक्य नाही, हा दुर्बल विचार मनातून काढून टाकण्याची गरज असल्याचे अमित निकुंभ यांनी सांगितले. महापुरूषांच्या विचाराची व्हावी आठवणसुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारे आम्ही एवढे निष्प्राण, निस्तेज कसे? कधी ऐकू येणार ती आरोळी, भारत माता की म्हंटल की कधी सबंध देश एका आवाजात ‘जय’ चा उदघोष करणार? प्रत्येकाने आपल्या लहानपणी पाहिलेले भारत देशाचे स्वप्न कधी साकार होणार? ज्या महापुरु षांची भाषणे आम्ही द्यायचो, ऐकायचो कधी त्यांच्या विचारांना आम्ही आमच्या जीवनात खरं स्थान देणार आहोत काय? कित्येक स्वातंत्र्य दिन आले, येतील आणि जातील पण त्या सुंदर देशाचे स्वप्न साकार करण्याचा बदल प्रत्यक्षात येईल काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असल्याने आपल्याला पुन्हा महापुरूषांच्या विचाराची आठवण व्हायला हवी असे प्रशांत दिक्षीत यांनी सांगितले. निवडणुका म्हणजे राष्ट्रीय सणनिवडणुका म्हणजे आमच्या देशात राष्ट्रीय सनासारख्या झाल्या आहेत, दर वर्षांनी, महिन्यांनी कसली न कसली निवडणूक घ्यायची, लोकांच्या कल्याणाची भाषा करायची, आम्ही ही ती ऐकायची आणि टाळ्या वाजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तेच ते चालू आहे, १ नाही २ नव्हे तर तब्बल गेल्या ६५ वर्षापासून ही पद्धत सुरू आहे. स्वतंत्र भारतात तीन पिढ्या बदलल्या पण आमच्या समस्या त्याच होत्या आणि आज ही त्याच आहेत; किंबहुना त्या समस्यांनी आता महाकाय स्वरूप घेतलं आहे. देश तर स्वतंत्र झाला, पण आम्ही अजून ही गुलामच राहिलो. स्वत:च्या स्वातंत्र्य साठी स्वत:लाच लढावे लागते, पण लढणे म्हणजे काय हेच आता आम्ही विसरलो असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.