शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

...तर चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:18 IST

आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले.

सिन्नर : आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले.  येथील सिन्नर महाविद्यालयात आदिवासी चळवळ या विषयावरील चर्चासत्र पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. जगाच्या इतिहासात आदिवासींचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. आदिवासीचा इतिहास, सामाजिक प्रश्न आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न भौगोलिक प्रश्न समजून घेऊनच त्यांना सद्यकालीन समाजप्रवाहाबरोबर आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांच्याविषयी आखलेल्या योजना, खर्च, ध्येयधोरणे आता प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचे असल्याचा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. अलीकडे आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. आदिवासींना दळणवळण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, तरच आदिवासी समाज आपल्याबरोबर सन्मानाने जगू शकेल, असे अध्यक्षीय भाषणात मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी सांगितले.यावेळी तालुका संचालक हेमंत वाजे याप्रसंगी म्हणाले की, आदिवासी समाजाची झालेली उपेक्षा बदलणे काळाची गरज आहे. त्यांना सर्व प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी प्रास्ताविक केले. आदिवासींचे प्रश्न त्यांच्यापुरते मर्यादित नसून ते तुमचे आमचे आहेत, असे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. चर्चासत्रातील दुसºया सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून प्रा. पी.डी. देवरे होते. यावेळी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आदिवासींच्या सामाजिक व राजकीय वाटचालीविषयी आपला शोधनिबंध सादर केला. त्यानंतर तिसºया सत्रामध्ये अध्यक्ष डॉ.मुकुंद दीक्षित होते, तर वक्ते म्हणून डॉ. पी.ए. घोष यांनी आपल्या शोधनिबंधातून आदिवासींचे संरक्षणशास्त्र या विषयावर आपले मत व्यक्त केले. प्रा.पांडुरंग भोये यांनी आदिवासींचे राजकारण याविषयी आपल्या शोधनिबंधातून विचार प्रकट केले. यावेळी ११५ विद्यार्थी व शिक्षकांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन चर्चा केली.

टॅग्स :collegeमहाविद्यालय