शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

...तर चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:18 IST

आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले.

सिन्नर : आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले.  येथील सिन्नर महाविद्यालयात आदिवासी चळवळ या विषयावरील चर्चासत्र पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. जगाच्या इतिहासात आदिवासींचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. आदिवासीचा इतिहास, सामाजिक प्रश्न आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न भौगोलिक प्रश्न समजून घेऊनच त्यांना सद्यकालीन समाजप्रवाहाबरोबर आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांच्याविषयी आखलेल्या योजना, खर्च, ध्येयधोरणे आता प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचे असल्याचा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. अलीकडे आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. आदिवासींना दळणवळण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, तरच आदिवासी समाज आपल्याबरोबर सन्मानाने जगू शकेल, असे अध्यक्षीय भाषणात मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी सांगितले.यावेळी तालुका संचालक हेमंत वाजे याप्रसंगी म्हणाले की, आदिवासी समाजाची झालेली उपेक्षा बदलणे काळाची गरज आहे. त्यांना सर्व प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी प्रास्ताविक केले. आदिवासींचे प्रश्न त्यांच्यापुरते मर्यादित नसून ते तुमचे आमचे आहेत, असे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. चर्चासत्रातील दुसºया सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून प्रा. पी.डी. देवरे होते. यावेळी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आदिवासींच्या सामाजिक व राजकीय वाटचालीविषयी आपला शोधनिबंध सादर केला. त्यानंतर तिसºया सत्रामध्ये अध्यक्ष डॉ.मुकुंद दीक्षित होते, तर वक्ते म्हणून डॉ. पी.ए. घोष यांनी आपल्या शोधनिबंधातून आदिवासींचे संरक्षणशास्त्र या विषयावर आपले मत व्यक्त केले. प्रा.पांडुरंग भोये यांनी आदिवासींचे राजकारण याविषयी आपल्या शोधनिबंधातून विचार प्रकट केले. यावेळी ११५ विद्यार्थी व शिक्षकांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन चर्चा केली.

टॅग्स :collegeमहाविद्यालय