शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

...तर चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:18 IST

आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले.

सिन्नर : आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले.  येथील सिन्नर महाविद्यालयात आदिवासी चळवळ या विषयावरील चर्चासत्र पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. जगाच्या इतिहासात आदिवासींचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. आदिवासीचा इतिहास, सामाजिक प्रश्न आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न भौगोलिक प्रश्न समजून घेऊनच त्यांना सद्यकालीन समाजप्रवाहाबरोबर आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांच्याविषयी आखलेल्या योजना, खर्च, ध्येयधोरणे आता प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचे असल्याचा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. अलीकडे आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. आदिवासींना दळणवळण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, तरच आदिवासी समाज आपल्याबरोबर सन्मानाने जगू शकेल, असे अध्यक्षीय भाषणात मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी सांगितले.यावेळी तालुका संचालक हेमंत वाजे याप्रसंगी म्हणाले की, आदिवासी समाजाची झालेली उपेक्षा बदलणे काळाची गरज आहे. त्यांना सर्व प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी प्रास्ताविक केले. आदिवासींचे प्रश्न त्यांच्यापुरते मर्यादित नसून ते तुमचे आमचे आहेत, असे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. चर्चासत्रातील दुसºया सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून प्रा. पी.डी. देवरे होते. यावेळी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आदिवासींच्या सामाजिक व राजकीय वाटचालीविषयी आपला शोधनिबंध सादर केला. त्यानंतर तिसºया सत्रामध्ये अध्यक्ष डॉ.मुकुंद दीक्षित होते, तर वक्ते म्हणून डॉ. पी.ए. घोष यांनी आपल्या शोधनिबंधातून आदिवासींचे संरक्षणशास्त्र या विषयावर आपले मत व्यक्त केले. प्रा.पांडुरंग भोये यांनी आदिवासींचे राजकारण याविषयी आपल्या शोधनिबंधातून विचार प्रकट केले. यावेळी ११५ विद्यार्थी व शिक्षकांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन चर्चा केली.

टॅग्स :collegeमहाविद्यालय