शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

मग, खरी नियमावली कोणती?

By admin | Updated: February 14, 2017 01:27 IST

मग, खरी नियमावली कोणती?

नाशिकची बांधकाम नियंत्रण व विकास नियमावली सोशल मीडियावर झळकल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीवर नाशिकचे प्रसिद्ध वास्तुविशारद अरुण काबरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना लिहिलेले हे अनावृत्त पत्र...मा. नामदार, गिरीश महाजनजी सप्रेम नमस्कार, नुकतीच प्रसिद्ध झालेली शहर विकास नियंत्रण नियमावली पूर्णत: खोटी असल्याचे प्रतिपादन आपण माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केल्याचे वाचण्यात आले. ही खोटी नियमावली प्रसिद्ध करणाऱ्यांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना आपण पोलीस खात्याला दिली असल्याचेही वृत्त आहे. ऐन निवडणुकीच्या दरम्यान हे घडले म्हणून मतांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी आपण त्वरित अ‍ॅक्शन घेतली आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन! मात्र गेल्या दोन वर्षांचा आपण शहराचा आढावा घेतला असता तर सरकारी धोरणे आणि दुर्लक्षांमुळे बांधकाम क्षेत्र किती अडचणीत आले आहे, त्याची आपणास खात्री पटली असती. शहर विकास आराखड्यातील गोंधळ, प्रचंड प्रमाणात वाढलेले विकास शुल्क, बांधकाम परवानग्या, पूर्णत्वाच्या दाखल्यास दिलेली स्थगिती, कपाटाचा गोंधळ या सर्व कारणांमुळे नाशिकची बांधकामे बंद पडली. कुशल व अकुशल कामगारांवर उपासमारीची वेळ आली. बिल्डर्स आणि डेव्हलपर कर्जबाजारी झाले. आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्सवर बेकारीची वेळ आली. एकूणच नाशिकचा विकास ठप्प झाला. प्रत्येकवेळी सर्व व्यावसायिकांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सरकारकडे पाठपुरावाही केला. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही. नाशिकमधील सर्वच्या सर्र्व लोकप्रतिनिधी सरकार पक्षाचे असून ही परिस्थिती उद्भवली आहे. नाशिक शहरावर सततचा अन्याय होत आला आहे. त्यामुळे आम्ही व्यावसायिक सरकारी कार्यपद्धतीवर नाराज आहोत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली नियमावली खोटी असल्याचे आपण सांगतात, तर मग खरी नियमावली कोणती, हे स्पष्ट केल्यास नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होतील. आता ही नियमावली खरी नाही म्हणता म्हणता निवडणुकीनंतर हीच नियमावली खरी म्हणून सादर करण्यात आली तर त्यात नाशिककरांना आश्चर्य वाटू नये. नाशिककरांवर आत्तापर्यंत असाच अन्याय होत आला असून, आता तर जुनी नियमावली नाही आणि नवीनही नाही, अशा कात्रीत महापालिका आणि व्यावसायिक सापडले आहेत. आपला पक्ष नाशिक महापालिकेत सत्तास्थानी आला तरी आश्वासनांची पूर्तता करायची किंवा नाही हे लोकभावनेपेक्षा सरकारी मर्जीवर अवंलबून राहणार आहे. कारण नाशिककर निरुपद्रवी आहेत, हे आपणास माहीत आहेच !- अरुण काबरे,वास्तुविशारद, नाशिक