शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

...तेव्हा दिलीप कुमारांना बघण्यासाठी नाशिकरांची झाली होती तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित ...

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित राहावे, असे समन्स जिल्हा व सत्र न्यायालयाने काढले होते. त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर जाऊन समन्स बजावण्यात आला होता, असे ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांनी त्यांच्याविषयीची आठवण सांगितली. या खटल्यात चव्हाण हे दिलीपकुमार यांच्याविरुध्द पक्षाचे वकील होते. फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे समन्स गेल्यानंतरही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नावाचे वॉरंटदेखील न्यायालयाकडून काढण्यात आले होते. यानंतर दिलीपकुमार यांनी सुनावणीच्या तारखेला जिल्हा व सत्र न्यायालयात हजेरी लावली. फौजदारी खटल्यात त्यांनी हजर होण्याची ही पहिलीच वेळ होती. याप्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी त्यांची झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने न्यायालयाच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सुनावणी सुरू असेपर्यंत शहराच्या मध्यवर्ती सीबीएससारख्या भागात नागरिकांची गर्दी कायम होती. पोलिसांनी मुख्य रस्त्याच्या बाजूला गर्दी थांबवून ठेवली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान चव्हाण यांच्याकडून युक्तिवादादरम्यान त्यांच्या जामीन अर्जास विरोधही करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत दिलीपकुमार यांची जामिनावर मुक्तता केली होती. त्यानंतर दिलीपकुमार यांनी विरुध्द पक्षाच्या तडजोडीचा प्रस्ताव मान्य करत या जमीन वाद प्रकरणावर पडदा टाकून समझोता केला होता. यामुळे त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यात आले होते. या प्रकरणात महिला जमीन मालकास दिलीपकुमार यांनी काही रक्कमदेखील अदा केली होती. हा खटला थेट उच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला होता.

---इन्फो--

दिलीप सहाब नाशिकच्या प्रेमात

दिलीप कुमार यांचे बालपण नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गेलेले असल्यामुळे त्यांचा तसा नाशिकशी जिव्हाळ्याचा ऋुणानुबंध आला होता आणि तो अखेरपर्यंत कायमच राहिला. गंगा जमुनासारख्या हिट चित्रपटाच्या शूटिंगकरितासुध्दा दिलीप सहाब यांनी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील इंग्रज काळातील रोकडे वाड्याला पसंती दिली होती. नाशिकसोबत ते नेहमीच ‘कनेक्ट’ होते. येथील आल्हाददायक वातावरण, त्यावेळेचे टुमदार शांत शहर आणि निसर्गरम्य वातावरण अशा सर्वांमुळे या महानायकाला नाशिकच्या प्रेमात पडण्याचा मोह आवरता येऊ शकला नव्हता.