शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

...तेव्हा दिलीप कुमारांना बघण्यासाठी नाशिकरांची झाली होती तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित ...

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित राहावे, असे समन्स जिल्हा व सत्र न्यायालयाने काढले होते. त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर जाऊन समन्स बजावण्यात आला होता, असे ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांनी त्यांच्याविषयीची आठवण सांगितली. या खटल्यात चव्हाण हे दिलीपकुमार यांच्याविरुध्द पक्षाचे वकील होते. फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे समन्स गेल्यानंतरही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नावाचे वॉरंटदेखील न्यायालयाकडून काढण्यात आले होते. यानंतर दिलीपकुमार यांनी सुनावणीच्या तारखेला जिल्हा व सत्र न्यायालयात हजेरी लावली. फौजदारी खटल्यात त्यांनी हजर होण्याची ही पहिलीच वेळ होती. याप्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी त्यांची झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने न्यायालयाच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सुनावणी सुरू असेपर्यंत शहराच्या मध्यवर्ती सीबीएससारख्या भागात नागरिकांची गर्दी कायम होती. पोलिसांनी मुख्य रस्त्याच्या बाजूला गर्दी थांबवून ठेवली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान चव्हाण यांच्याकडून युक्तिवादादरम्यान त्यांच्या जामीन अर्जास विरोधही करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत दिलीपकुमार यांची जामिनावर मुक्तता केली होती. त्यानंतर दिलीपकुमार यांनी विरुध्द पक्षाच्या तडजोडीचा प्रस्ताव मान्य करत या जमीन वाद प्रकरणावर पडदा टाकून समझोता केला होता. यामुळे त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यात आले होते. या प्रकरणात महिला जमीन मालकास दिलीपकुमार यांनी काही रक्कमदेखील अदा केली होती. हा खटला थेट उच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला होता.

---इन्फो--

दिलीप सहाब नाशिकच्या प्रेमात

दिलीप कुमार यांचे बालपण नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गेलेले असल्यामुळे त्यांचा तसा नाशिकशी जिव्हाळ्याचा ऋुणानुबंध आला होता आणि तो अखेरपर्यंत कायमच राहिला. गंगा जमुनासारख्या हिट चित्रपटाच्या शूटिंगकरितासुध्दा दिलीप सहाब यांनी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील इंग्रज काळातील रोकडे वाड्याला पसंती दिली होती. नाशिकसोबत ते नेहमीच ‘कनेक्ट’ होते. येथील आल्हाददायक वातावरण, त्यावेळेचे टुमदार शांत शहर आणि निसर्गरम्य वातावरण अशा सर्वांमुळे या महानायकाला नाशिकच्या प्रेमात पडण्याचा मोह आवरता येऊ शकला नव्हता.