शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

...तर राज्य शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:14 IST

नाशिक- कोरोना काळामुळे राज्य शासनाला सहकार्य करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, राज्य सरकार व्यापारी वर्गाचा विचार करीत नाही. ...

नाशिक- कोरोना काळामुळे राज्य शासनाला सहकार्य करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, राज्य सरकार व्यापारी वर्गाचा विचार करीत नाही. साडेपाच हजार कोटींच्या पॅकेजमध्येे व्यापारी वर्गाला साधी सवलत देखील दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनसारखे निर्बंध राज्य सरकारला घालता येऊ शकतात की नाही याबाबत शंका आहे. त्याचा कायदेशीर अभ्यास सध्या करण्यात येत असून प्रसंगी उच्च न्यायालयात देखील दाद मागण्याची तयारी असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतेाष मंडलेचा यांनी दिली.

राज्य सरकारने दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याच्या घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सने भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भात चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- ब्रेक द चेन विषयी नक्की व्यापाऱ्यांची भूमिका काय?

मंडलेचा- राज्य सरकारने ५ एप्रिल रोजी पहिल्यांदा निर्बंध लागू केले. त्यावेळी पासून चेंबरने व्यापारी आणि त्यांच्याकडील कामगार वर्गाचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. मात्र ब्रेक द चेनचा टप्पा सुरू होताना मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता चेंबरला कायदेशीर सल्ला घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनसारखा निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकते असे काही तज्ज्ञांचे म्हणणे त्याअनुषंगाने अभ्यास सुरू आहे. अर्थात लॉकडाऊनला सहकार्य करण्याची चेंबरची तयारी होती. मात्र तसा थेट निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही.

प्रश्न- चेंबरची नेमकी मागणी काय?

मंडलेचा- गेल्या वर्षापासून बाजारपेठा बंद असल्याचा सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. बाजारपेठेतील निर्बंधात व्यापाऱ्यांसाठी कुठे तरी शिथिलता हवी होती ती मिळाली नाही. तसेच गेल्या वर्षीपासून आम्ही पॅकेज किंवा सवलतीसाठी भांडतोय परंतु त्याचा उपयोग होत नाही. व्यापाऱ्यांना आर्थिक मदत किंवा दिलासा मिळावा ही प्रमुख मागणी आहे. किमान वीज बिल किंवा घरपट्टी कुठे तरी करात सवलत मिळाली तरी पुरेसे आहे परंतु सरकार त्याबाबत काहीच निर्णय घेत नाही हे दुर्दैव आहे.