शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

...तर रास्ता रोको झालाच नसता

By admin | Updated: October 9, 2015 22:40 IST

चिमुरड्याचा बळी : वाहतूक शाखेचा सुस्त कारभार

पंचवटी : बुधवारी दुपारच्या सुमाराला शाळा सुटल्यानंतर नातवंडांसह घराकडे पायी घेऊन जाणाऱ्या आजीसह दोघा नातवंडांना भरधाव जाणाऱ्या शहर बसने धडक दिली. या घटनेत रोनित चव्हाण या अडीचवर्षीय बालकाचा बसच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर वाहतूक शाखेने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तसेच कर्तव्य म्हणून त्याच दिवसापासून सेवाकुंजवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे होते; मात्र अपघाताचा तो दिवस वगळता दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलीस नसल्याचे बघून नागरिकांनी वाहतूक शाखेच्या सुस्त कारभारावर संताप व्यक्त करत शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला.सेवाकुंज परिसरात चार ते पाच शाळा असल्याने या भागात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहतूक शाखेकडे शाळा व्यवस्थापन व परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा केली होती; मात्र बुधवारच्या दिवशी अपघाताची घटना आणि त्यानंतरदेखील त्याठिकाणी पोलीस नाही हे बघून नागरिकांचा पारा चढला आणि रास्ता रोको झाला. जर शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलीस प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असते तर रास्ता रोको झालाच नसता हे तितकेच खरे आहे. ज्या दिवशी अपघात घडला त्याच दिवशी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ पोलीस कर्मचारी नेमणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे वाहतूक शाखेची दिरंगाई आणि सुस्त कारभाराचे दर्शन या निमित्ताने झाले व त्यातून झालेल्या रास्ता रोकोला वाहतूक शाखाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या झाल्याप्रकाराला वाहतूक शाखाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केल्याने पोलीस आयुक्त या प्रकाराची कितपत दखल घेतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.