शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

...तर रास्ता रोको झालाच नसता

By admin | Updated: October 9, 2015 22:40 IST

चिमुरड्याचा बळी : वाहतूक शाखेचा सुस्त कारभार

पंचवटी : बुधवारी दुपारच्या सुमाराला शाळा सुटल्यानंतर नातवंडांसह घराकडे पायी घेऊन जाणाऱ्या आजीसह दोघा नातवंडांना भरधाव जाणाऱ्या शहर बसने धडक दिली. या घटनेत रोनित चव्हाण या अडीचवर्षीय बालकाचा बसच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर वाहतूक शाखेने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तसेच कर्तव्य म्हणून त्याच दिवसापासून सेवाकुंजवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे होते; मात्र अपघाताचा तो दिवस वगळता दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलीस नसल्याचे बघून नागरिकांनी वाहतूक शाखेच्या सुस्त कारभारावर संताप व्यक्त करत शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला.सेवाकुंज परिसरात चार ते पाच शाळा असल्याने या भागात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहतूक शाखेकडे शाळा व्यवस्थापन व परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा केली होती; मात्र बुधवारच्या दिवशी अपघाताची घटना आणि त्यानंतरदेखील त्याठिकाणी पोलीस नाही हे बघून नागरिकांचा पारा चढला आणि रास्ता रोको झाला. जर शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलीस प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असते तर रास्ता रोको झालाच नसता हे तितकेच खरे आहे. ज्या दिवशी अपघात घडला त्याच दिवशी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ पोलीस कर्मचारी नेमणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे वाहतूक शाखेची दिरंगाई आणि सुस्त कारभाराचे दर्शन या निमित्ताने झाले व त्यातून झालेल्या रास्ता रोकोला वाहतूक शाखाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या झाल्याप्रकाराला वाहतूक शाखाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केल्याने पोलीस आयुक्त या प्रकाराची कितपत दखल घेतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.