शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

...तर स्टेअरिंगवर येणार डुलकी

By admin | Updated: December 9, 2015 23:39 IST

नाशिकचा मुक्काम नको रे बाप्पा : ठक्कर बाजार बसस्थानकामधील विश्रांतीगृह बनले समस्यांचे आगार

नाशिक : ‘एक डुलकी एक अपघात’, ‘ नजर हटी दुर्घटना घटी’, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ ‘समय मौल्यवान हैं, जीवन अमूल्य हैं’ वाहतुकीसंदर्भात प्रबोधन करणारे असे विविध घोषवाक्यांचे फलक महामार्गांवर नजरेस पडतात. हे फलक लावण्यामागचा उद्देश एकच की रस्ते अपघात टाळले जावे, वाहतुकीच्या नियमांचे वाहनचालकांनी पालन करावे; मात्र अनेकदा याकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. असेच काहीसे दुर्लक्ष परिवहन महामंडळाकडूनही होत असून वाहनचालकांना पुरेशी झोप मिळेल असे विश्रांतीगृहदेखील उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. वाहनचालकांना पुरेशी झोपही बसस्थानकाच्या विश्रांतीगृहामध्ये घेणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे संध्याकाळी-रात्रीच्या वेळी प्रवाशांची बसेसद्वारे वाहतूक करत असताना स्टेअरिंगवर ‘डुलकी’ लागण्याची चिंता बसचालकांना सध्या सतावत आहे.ठक्कर बाजार नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात प्रवेश करताच स्पष्ट होते. रात्रपाळीच्या बसफेऱ्या करणाऱ्या चालक-वाहकांसाठी तयार करण्यात आलेले विश्रांतीगृह हे केवळ नावापुरतेच आहे. यामुळे राज्यभरातून येथे येणाऱ्या चालक-वाहकांच्या उरात नाशिकच्या मुक्कामाने धडकी भरते. ना पिण्याचे पाणी ना वापरायचे पाणी, प्रसाधनगृहाची दुर्दशा, अपुरी जागा, डासांची गुणगुण, दुर्गंधीचे वातावरण अशा एक ना अनेक समस्यांचे ‘ग्रहण’ लागल्याने विश्रांतीगृह हे समस्यांचे आगार बनल्याचे चित्र आहे.‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ असा जनसामान्यांना विश्वास आहे. एका चालकाच्या खांद्यावर किमान ५० प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. बसमधील प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छितस्थळापर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी कौशल्यपूर्ण वाहतूक करण्यावर बहुतांश चालक भर देतात. महामार्गावर असणाऱ्या ‘एक डुलकी एक अपघात’ या सूचनाफलकानुसार अनेकदा एसटीला अपघात झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत राज्य परिवहन महामंडळ ‘दक्षता’ घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मध्यरात्री बसच्या फेऱ्या असलेल्या चालकाला जर दुपारच्या वेळी पुरेशी झोप मिळत नसेल तर रात्रीच्या सुमारास वाहतूक करताना त्याला डुलकी येणे स्वाभाविक आहे. याबाबत महामंडळाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मध्यवर्ती बसस्थानकात राज्यभरातून बसेस येतात, त्यामुळे त्या बसचालकांसाठी सुसज्ज असे अद्ययावत विश्रांतीगृह असणे गरजेचे आहे. कारण या बसचालकांवरच रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची धुरा आहे. मध्यवर्ती नवीन बसस्थानकातील विश्रांतीगृहाची अस्वच्छता, दुर्गंधीमुळे ‘गोठा’च झाला आहे. (प्रतिनिधी)