शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

...तर स्टेअरिंगवर येणार डुलकी

By admin | Updated: December 9, 2015 23:39 IST

नाशिकचा मुक्काम नको रे बाप्पा : ठक्कर बाजार बसस्थानकामधील विश्रांतीगृह बनले समस्यांचे आगार

नाशिक : ‘एक डुलकी एक अपघात’, ‘ नजर हटी दुर्घटना घटी’, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ ‘समय मौल्यवान हैं, जीवन अमूल्य हैं’ वाहतुकीसंदर्भात प्रबोधन करणारे असे विविध घोषवाक्यांचे फलक महामार्गांवर नजरेस पडतात. हे फलक लावण्यामागचा उद्देश एकच की रस्ते अपघात टाळले जावे, वाहतुकीच्या नियमांचे वाहनचालकांनी पालन करावे; मात्र अनेकदा याकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. असेच काहीसे दुर्लक्ष परिवहन महामंडळाकडूनही होत असून वाहनचालकांना पुरेशी झोप मिळेल असे विश्रांतीगृहदेखील उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. वाहनचालकांना पुरेशी झोपही बसस्थानकाच्या विश्रांतीगृहामध्ये घेणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे संध्याकाळी-रात्रीच्या वेळी प्रवाशांची बसेसद्वारे वाहतूक करत असताना स्टेअरिंगवर ‘डुलकी’ लागण्याची चिंता बसचालकांना सध्या सतावत आहे.ठक्कर बाजार नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात प्रवेश करताच स्पष्ट होते. रात्रपाळीच्या बसफेऱ्या करणाऱ्या चालक-वाहकांसाठी तयार करण्यात आलेले विश्रांतीगृह हे केवळ नावापुरतेच आहे. यामुळे राज्यभरातून येथे येणाऱ्या चालक-वाहकांच्या उरात नाशिकच्या मुक्कामाने धडकी भरते. ना पिण्याचे पाणी ना वापरायचे पाणी, प्रसाधनगृहाची दुर्दशा, अपुरी जागा, डासांची गुणगुण, दुर्गंधीचे वातावरण अशा एक ना अनेक समस्यांचे ‘ग्रहण’ लागल्याने विश्रांतीगृह हे समस्यांचे आगार बनल्याचे चित्र आहे.‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ असा जनसामान्यांना विश्वास आहे. एका चालकाच्या खांद्यावर किमान ५० प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. बसमधील प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छितस्थळापर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी कौशल्यपूर्ण वाहतूक करण्यावर बहुतांश चालक भर देतात. महामार्गावर असणाऱ्या ‘एक डुलकी एक अपघात’ या सूचनाफलकानुसार अनेकदा एसटीला अपघात झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत राज्य परिवहन महामंडळ ‘दक्षता’ घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मध्यरात्री बसच्या फेऱ्या असलेल्या चालकाला जर दुपारच्या वेळी पुरेशी झोप मिळत नसेल तर रात्रीच्या सुमारास वाहतूक करताना त्याला डुलकी येणे स्वाभाविक आहे. याबाबत महामंडळाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मध्यवर्ती बसस्थानकात राज्यभरातून बसेस येतात, त्यामुळे त्या बसचालकांसाठी सुसज्ज असे अद्ययावत विश्रांतीगृह असणे गरजेचे आहे. कारण या बसचालकांवरच रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची धुरा आहे. मध्यवर्ती नवीन बसस्थानकातील विश्रांतीगृहाची अस्वच्छता, दुर्गंधीमुळे ‘गोठा’च झाला आहे. (प्रतिनिधी)