शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

...तर स्टेअरिंगवर येणार डुलकी

By admin | Updated: December 9, 2015 23:39 IST

नाशिकचा मुक्काम नको रे बाप्पा : ठक्कर बाजार बसस्थानकामधील विश्रांतीगृह बनले समस्यांचे आगार

नाशिक : ‘एक डुलकी एक अपघात’, ‘ नजर हटी दुर्घटना घटी’, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ ‘समय मौल्यवान हैं, जीवन अमूल्य हैं’ वाहतुकीसंदर्भात प्रबोधन करणारे असे विविध घोषवाक्यांचे फलक महामार्गांवर नजरेस पडतात. हे फलक लावण्यामागचा उद्देश एकच की रस्ते अपघात टाळले जावे, वाहतुकीच्या नियमांचे वाहनचालकांनी पालन करावे; मात्र अनेकदा याकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. असेच काहीसे दुर्लक्ष परिवहन महामंडळाकडूनही होत असून वाहनचालकांना पुरेशी झोप मिळेल असे विश्रांतीगृहदेखील उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. वाहनचालकांना पुरेशी झोपही बसस्थानकाच्या विश्रांतीगृहामध्ये घेणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे संध्याकाळी-रात्रीच्या वेळी प्रवाशांची बसेसद्वारे वाहतूक करत असताना स्टेअरिंगवर ‘डुलकी’ लागण्याची चिंता बसचालकांना सध्या सतावत आहे.ठक्कर बाजार नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात प्रवेश करताच स्पष्ट होते. रात्रपाळीच्या बसफेऱ्या करणाऱ्या चालक-वाहकांसाठी तयार करण्यात आलेले विश्रांतीगृह हे केवळ नावापुरतेच आहे. यामुळे राज्यभरातून येथे येणाऱ्या चालक-वाहकांच्या उरात नाशिकच्या मुक्कामाने धडकी भरते. ना पिण्याचे पाणी ना वापरायचे पाणी, प्रसाधनगृहाची दुर्दशा, अपुरी जागा, डासांची गुणगुण, दुर्गंधीचे वातावरण अशा एक ना अनेक समस्यांचे ‘ग्रहण’ लागल्याने विश्रांतीगृह हे समस्यांचे आगार बनल्याचे चित्र आहे.‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ असा जनसामान्यांना विश्वास आहे. एका चालकाच्या खांद्यावर किमान ५० प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. बसमधील प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छितस्थळापर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी कौशल्यपूर्ण वाहतूक करण्यावर बहुतांश चालक भर देतात. महामार्गावर असणाऱ्या ‘एक डुलकी एक अपघात’ या सूचनाफलकानुसार अनेकदा एसटीला अपघात झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत राज्य परिवहन महामंडळ ‘दक्षता’ घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मध्यरात्री बसच्या फेऱ्या असलेल्या चालकाला जर दुपारच्या वेळी पुरेशी झोप मिळत नसेल तर रात्रीच्या सुमारास वाहतूक करताना त्याला डुलकी येणे स्वाभाविक आहे. याबाबत महामंडळाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मध्यवर्ती बसस्थानकात राज्यभरातून बसेस येतात, त्यामुळे त्या बसचालकांसाठी सुसज्ज असे अद्ययावत विश्रांतीगृह असणे गरजेचे आहे. कारण या बसचालकांवरच रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची धुरा आहे. मध्यवर्ती नवीन बसस्थानकातील विश्रांतीगृहाची अस्वच्छता, दुर्गंधीमुळे ‘गोठा’च झाला आहे. (प्रतिनिधी)