शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

झाडांभोवतीच्या संरक्षक जाळ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:44 IST

सिन्नर: वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान सुमारे पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडांची वनविभागाकडून निगा राखण्या त येत आहे.

सिन्नर: वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान सुमारे पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडांची वनविभागाकडून निगा राखण्या त येत आहे. झाडांभोवती पावसाळ्यापूर्वी लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या संरक्षक जाळ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडू लागले असून परिसरातीलच काही शेतकरी आपल्या बांधावरील झाडांसाठी या जाळ्यात काढून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेकडून दोन वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात वावी ते पंचाळे दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले आहे. तर हिवरगाव पर्यंत पुढील टप्प्यात वृक्ष रोपण प्रस्तावित आहेत. रस्तेबांधणी प्रकल्पात झाडे लावून त्याची जोपासना करण्याचे बंधन ठेकेदारांना असले तरी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत वन विभागाने घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. तर वनरक्षक दर्शना सौपुरे यांच्यावर या झाडांची निगा राखणे व संरक्षणाची जबाबदारी आहे. स्थानिक वन मजुरांच्या मदतीने गेली दोन वर्ष या झाडांची सर्व प्रकारे निगा राखली जात आहे. उन्हाळयात टँकरने पाणी घातल्याने हि झाडे बहरली असून त्यामुळे लवकरच वावी ते पंचाळे रस्ता हरित मार्ग म्हणून गणला जाणार आहे. या झाडाच्या संरक्षणासाठी वनविभागाने उन्हाळ्यात प्लास्टिकच्या जाळ्यात लावल्या. सुमारे साडेचार हजार झाडांना हे संरक्षक कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, या जाळ्या आता चोरट्यांचे लक्ष ठरू लागल्या आहेत. परिसरातील काही शेतकरी या जाळ्या काढून आपल्या शेतात लावलेल्या झाडांसाठी किंवा कोंबड्यांच्या खुराड्या साठी त्यांचा वापर करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: पाठलाग करून अशाप्रकारे जाळ्याची चोरी करणाºया शेतकºयांना अनेकदा हटकवले आहे. तरी देखील हे प्रकार सर्रास सुरू असल्याने रस्त्यालगत लागवड केलेल्या झाडांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी