शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

श्रेयवाद पेटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:57 IST

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात श्रेयवाद पेटल्याने पुनंद पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शहरासाठी संजीवनी ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षामुळे गुंडाळल्यानंतर आता पुनंद पाणीपुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात पुन्हा एकदा श्रेयवाद पेटल्याने ही योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष सुनील मोरे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पुनंद योजनेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण या दांपत्याने येथील शासकीय विश्रामगृहात योजना कोणी प्रस्तावित केली याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. आमच्या मातोश्री नगराध्यक्ष असताना दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी पुनंद पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बहुमताने ठराव मंजूर केला. त्यानंतर दि. ७ जुलै २०१६ रोजी शासन स्तरावर या योजनेसाठी पुनंद प्रकल्पामधून २.३६५२ दशलक्ष घनमीटर पाणी  कायमस्वरूपी आरक्षित करून घेतले. या योजनेच्या सर्वेेक्षणसाठी दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी दहा लाख रुपयांची तरतूद करून सर्वेक्षण पूर्ण करून घेतले. या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतरच आपण सादर केलेल्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली. या योजनेला अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी दि. १७ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक काका सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, भरत खैरनार, झिप्रूअण्णा पाटील, ज. ल. पाटील, धर्मा पाटील, आनंद सोनवणे, जनार्दन सोनवणे, नामपूरच्या सरपंच रंजना मुथा, सोनाली निकम, अशोक सावंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे, निखील गीते आदी उपस्थित होते.