शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्रेयवाद पेटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:57 IST

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात श्रेयवाद पेटल्याने पुनंद पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शहरासाठी संजीवनी ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षामुळे गुंडाळल्यानंतर आता पुनंद पाणीपुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात पुन्हा एकदा श्रेयवाद पेटल्याने ही योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष सुनील मोरे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पुनंद योजनेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण या दांपत्याने येथील शासकीय विश्रामगृहात योजना कोणी प्रस्तावित केली याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. आमच्या मातोश्री नगराध्यक्ष असताना दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी पुनंद पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बहुमताने ठराव मंजूर केला. त्यानंतर दि. ७ जुलै २०१६ रोजी शासन स्तरावर या योजनेसाठी पुनंद प्रकल्पामधून २.३६५२ दशलक्ष घनमीटर पाणी  कायमस्वरूपी आरक्षित करून घेतले. या योजनेच्या सर्वेेक्षणसाठी दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी दहा लाख रुपयांची तरतूद करून सर्वेक्षण पूर्ण करून घेतले. या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतरच आपण सादर केलेल्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली. या योजनेला अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी दि. १७ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक काका सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, भरत खैरनार, झिप्रूअण्णा पाटील, ज. ल. पाटील, धर्मा पाटील, आनंद सोनवणे, जनार्दन सोनवणे, नामपूरच्या सरपंच रंजना मुथा, सोनाली निकम, अशोक सावंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे, निखील गीते आदी उपस्थित होते.