शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कृतज्ञता हा जीवनातील महान गुण : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:33 IST

पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कालापूर्णम् धाममध्ये उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, केलेल्या उपकारांना विसरून जाणे म्हणजे कृतघ्नता हा सर्वांत मोठा दुर्गुण आहे. उपधान तपातील आराधकांना मी उत्तम कृतज्ञ मानत आहे. उपधान तप पूर्ण झाल्यानंतर साधकांची पाप रसिकता घटायला हवी व धर्म रसिकता वाढायला हवी. तसेच मोक्ष रसिकता हृदयात जन्मायला यावी. पापाच्या अशुचित आपण सर्व आतापर्यंत अडकलेलो होतो. मात्र आता उपधान तपाच्या स्नानकुंडात शुद्ध झाल्यानंतर पुन्हा अनाचाराने आत्मा मलीन न होण्यासाठीच तुम्हाला व्रत, नियम, बंधन यांची नियमावली दिलेली आहे. ही नियमावली तुमच्या आत्म्याच्या संरक्षणासाठी तिजोरी स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे पैशाला तिजोरीत ठेवल्यानंतर आपण निश्चिंत होतो. तसेच तुमचे आत्मधन सुरक्षित ठेवायचे असेल तर उपधान तपाच्या नियमांची तिजोरी घेऊन जाणे आवश्यक आहे. तुम्ही सुखाचा आनंद स्वचित अनुभवला असेल, खाण्याचा आनंद अनुभवण्याची जी संधी लाभली आहे ती तुमच्या जीवनासाठी सुवर्णसंधी म्हणून सदा अविस्मरणीय होवो असे सांगत जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी शालिभद्रच्या कथेचा काही भाग सांगितला.दीक्षार्थी वरघोडा शोभायात्राउपधान तपातील मुंबई येथील महिला साधक मंजूलाबेन निमावत व सुरत येथील १३ वर्षांची मुलगी मोक्षाबेन शाह या दीक्षार्थींची वरघोडा शोभायात्रा शनिवारी सकाळी बेलतगव्हाणरोड कहाननगरपासून बालगृहरोड कलापूर्णम् तीर्थधामपर्यंत काढण्यात आली होती. दीक्षार्थी वरघोडा शोभायात्रेत गच्छाधिराज जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्य, साधू-संत, साध्वी, साधक, जैन बांधव सहभागी झाले होते. सायंकाळी भजनसंध्या कार्यक्रम पार पडला. रविवारी सकाळी दीक्षा सोहळा समारंभ होणार आहे.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरReligious programmeधार्मिक कार्यक्रम