शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

ठिय्या : कांद्याचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकल्याने शेतकरी संतप्त मालेगावी उपनिबंधकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:19 IST

मालेगाव : बाजार समितीच्या व्यापाºयाकडील कांदा विक्रीचे पैसे शेतकºयांना परत मिळवून देण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याने संतप्त शेतकºयांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी शनिवारी येथील उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करून उपनिबंधकांना घेराव घालून संचालक मंडळाला धारेवर धरले होते.

ठळक मुद्देपैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांची मालमत्ता विक्री कराव्यापारी व बाजार समिती शेतकºयांची फसवणूक करीत आहे

मालेगाव : बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील व्यापाºयाकडील कांदा विक्रीचे पैसे शेतकºयांना परत मिळवून देण्यास बाजार समिती पदाधिकारी व प्रशासन असमर्थ ठरत असल्याने संतप्त शेतकºयांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी शनिवारी येथील उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करून उपनिबंधकांना घेराव घालून संचालक मंडळाला धारेवर धरले होते. दरम्यान, १४ मे रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात येऊन शेतकºयांचे पैसे न देणाºया व्यापाºयांवर काय कारवाई करता येईल याबाबत चर्चा करणार असल्याचे लेखी आश्वासन उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांची मालमत्ता विक्री करा, शेतकºयांचे पैसे अदा करा, पैसे काढून देण्यास असमर्थ ठरलेले संचालक मंडळ बरखास्त करा. वेळप्रसंगी त्यांच्याकडूनच रक्कमा वसूल करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. व्यापारी व बाजार समिती शेतकºयांची फसवणूक करीत आहे. संचालक मंडळाच्या भूमिकेमुळे संपूर्ण प्रकरणच दाबून टाकले जाण्याची भीती शेतकºयांनी यावेळी व्यक्त केली. उपनिबंधकांनी या प्रकरणाची दखल घेऊन संचालक मंडळ बरखास्त करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांनी लावून धरली होती. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनील देवरे यांनी मुंगसे खरेदी-विक्री केंद्रावरील जय भोलेनाथ ट्रेडर्स कंपनीचे व्यापाºयाकडे अडकलेले पैसे घेण्यासाठी बांगलादेशला शिष्टमंडळ जाऊन आले. व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांना बांगलादेशला थांबून पैसे वसूल करून येतील. तेथील व्यापारी ५० लाख स्वत: व त्यांच्या संपर्कातील पिंपळगाव बाजार समितीतील एक व्यापारी ५० लाख देणार आहे. पैसे मिळण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. तोपर्यंत शेतकºयांनी संयम ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन केले. मात्र संतप्त शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर संचालकांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला. त्यानंतर उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांच्या कारवाई संदर्भातील प्रश्नांचा भडिमार करीत धारेवर धरण्यात आले. निर्णयाची माहिती शेतकºयांना दिली जाईल, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास १५ मे रोजी उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी दिला. या आंदोलनात प्रभाकर शेवाळे, देवा पाटील, विलास मुंडे, किरण गवळे, चंदू शेवाळे, कल्याण शेवाळे, बाळू सावकार, निवृत्ती जाधव, संतोष शेलार, अतुल पवार, रतन धोंडगे, सुनील आहिरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.