शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

थेट सरपंच निवडीचे मतदारांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:12 IST

नीलेश नहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : ग्रामपालिकेच्या निवडणुकांमध्ये येत्या काळात सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिक व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच ...

नीलेश नहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : ग्रामपालिकेच्या निवडणुकांमध्ये येत्या काळात सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिक व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, माहे सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींना निर्णय लागू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तसेच याबाबत नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यासाठी १९ जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुन्या सरपंच निवडपद्धतीत सदस्यांचे बहुमत सिद्ध करावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत होता, तसेच घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना पदापासून वंचित राहावे लागत होते; मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या मतांचे महत्त्व वाढणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात असून, या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. थेट सरपंच निवडीत निवडलेल्या सरपंचावर निवडीनंतर दोन वर्षापर्यंत व पाच वर्षे कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने अगोदर कोणताही अविश्वास ठराव मांडला येणार नाही व त्याचप्रमाणे सरपंचाचे अधिकार ही वाढविण्यात आले आहेत. सरपंचाला आर्थिक वार्षिक आराखडा बनविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयानंतर हा निर्णय झाल्याने पुढील काळात कशी प्रक्रि या राबवली जाईल याबाबत गावागावातील चौकांमध्ये गप्पा रंगत आहेत.तरुण मतदारांकडून स्वागतमालेगाव तालुक्यातील आॅक्टोबर महिन्यात मुदत संपणाºया दाभाडी, सौंदाणेसह इतर ग्रामपंचायतींनाही थेट सरपंच निवड लागू असणार आहे. यामुळे पहिल्यांदाच हा अनुभव गावातील मतदारांना मिळणार असल्याने वेगवेगळ्या कुतुहलाच्या प्रतिक्रि या पहावयास मिळत आहेत. या निर्णयाचे तरु ण मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. जुन्या सरपंच निवडपद्धतीत सदस्यांचे बहुमत सिद्ध करावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत होता, तसेच घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना पदापासून वंचित राहावे लागत होते; मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.