शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

थेट सरपंच निवडीचे मतदारांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:12 IST

नीलेश नहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : ग्रामपालिकेच्या निवडणुकांमध्ये येत्या काळात सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिक व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच ...

नीलेश नहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : ग्रामपालिकेच्या निवडणुकांमध्ये येत्या काळात सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिक व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, माहे सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींना निर्णय लागू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तसेच याबाबत नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यासाठी १९ जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुन्या सरपंच निवडपद्धतीत सदस्यांचे बहुमत सिद्ध करावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत होता, तसेच घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना पदापासून वंचित राहावे लागत होते; मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या मतांचे महत्त्व वाढणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात असून, या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. थेट सरपंच निवडीत निवडलेल्या सरपंचावर निवडीनंतर दोन वर्षापर्यंत व पाच वर्षे कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने अगोदर कोणताही अविश्वास ठराव मांडला येणार नाही व त्याचप्रमाणे सरपंचाचे अधिकार ही वाढविण्यात आले आहेत. सरपंचाला आर्थिक वार्षिक आराखडा बनविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयानंतर हा निर्णय झाल्याने पुढील काळात कशी प्रक्रि या राबवली जाईल याबाबत गावागावातील चौकांमध्ये गप्पा रंगत आहेत.तरुण मतदारांकडून स्वागतमालेगाव तालुक्यातील आॅक्टोबर महिन्यात मुदत संपणाºया दाभाडी, सौंदाणेसह इतर ग्रामपंचायतींनाही थेट सरपंच निवड लागू असणार आहे. यामुळे पहिल्यांदाच हा अनुभव गावातील मतदारांना मिळणार असल्याने वेगवेगळ्या कुतुहलाच्या प्रतिक्रि या पहावयास मिळत आहेत. या निर्णयाचे तरु ण मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. जुन्या सरपंच निवडपद्धतीत सदस्यांचे बहुमत सिद्ध करावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत होता, तसेच घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना पदापासून वंचित राहावे लागत होते; मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.