शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

जिल्हा बॅँकेच्या सभेकडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:54 IST

नाशिक : कर्जमाफीतील अडचणी, नोटाबंदीमुळे शेतकºयांची झालेली कोंडी, पिक कर्जाची बोंबाबोंब असे शेतकºयाच्या दैनंदिन बाबीशी निगडीत पश्न आ वासून उभे असताना प्रत्यक्षात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सभेत मात्र शेतकºयांनी या साºया विषयावर मौन पाळले. शेतकºयांच्या जेमतेम उपस्थितीत झालेली ही सभा अवघ्या ४० मिनीटातच सर्व विषय मंजुर करून गुंडाळण्यात आली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...

नाशिक : कर्जमाफीतील अडचणी, नोटाबंदीमुळे शेतकºयांची झालेली कोंडी, पिक कर्जाची बोंबाबोंब असे शेतकºयाच्या दैनंदिन बाबीशी निगडीत पश्न आ वासून उभे असताना प्रत्यक्षात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सभेत मात्र शेतकºयांनी या साºया विषयावर मौन पाळले. शेतकºयांच्या जेमतेम उपस्थितीत झालेली ही सभा अवघ्या ४० मिनीटातच सर्व विषय मंजुर करून गुंडाळण्यात आली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा बॅँकेच्या जुन्या इमारतीत घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे होते. केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या वार्षिक सभेकडे साºयांचेच लक्ष लागून होते. बॅँकेच्या संचालकांना बजावलेल्या नोटीसा, शेतकºयांच्या खात्यातून पैसे मिळण्यास होणारा विलंब, जिल्हा बॅँकेच्या ठेवींमध्ये झालेली घट, शिक्षक व सरकारी कर्मचाºयांनी केलेले खाते बदल व त्यातून बॅँकेला बसलेला आर्थिक फटका, खरीप उलटूनही शेतकºयांना न मिळालेले पीक कर्ज, शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बॅँकेची भूमिका आदी महत्वाच्या विषयांवर सभेत खल होण्याची व प्रसंगी संचालक मंडळाला धारेवर धरले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु प्रत्यक्षात या सभेला जेमतेम सभासद शेतकºयांची उपस्थिती लाभली. सभासदांची घसरलेल्या उपस्थितीवरूनच सभा लवकर आटोपली जाणार असे गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे सभा सुरू होताच बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बकाल यांनी गेल्या सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी ठेवले त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर बॅँकेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व विषय पत्रिकेवरील दहा विषयांना एकमुखाने मान्यता देण्यात आली. ज्येष्ठ सभासद पांडूरंग करंजकर यांनी आपले मत मांडतांना बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीवर बोट ठेवले. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नसल्याचे सांगून त्यांनी बॅँकेचे भवितव्य नाजूक असल्याची भिती व्यक्त केली तर पंडीतराव कातड यांनीही बॅँकेमुळे सोसायट्या धोक्यात आल्याचे सांगितले.