शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

नव्या औद्योगिक वसाहतीकडे उद्योजकांची पाठ

By admin | Updated: November 21, 2015 23:42 IST

नाशिक शहरापेक्षा अधिक दर : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव आक्राळे येथे जाण्यास गुंतवणूकदारांचा नकार

सातपूर : उद्योजकांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करावी यासाठी राज्य शासनाने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे पाचशे एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीची तयारी केली खरी; परंतु गुंतवणूक वाढविण्यासाठी सवलती देण्याची व्यवहार्यचतुरता दर्शविली नाही. उलट नाशिक शहरातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीपेक्षा हे दर जास्त आहेत. परिणामी उद्योजकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.गुजरातमध्ये कोणत्याही नव्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी जमिनीचे स्पर्धात्मक दर दिले जात असताना ते दूरच उलट २३०० रुपये ते तीन हजार रुपयांचे दर जाहीर केल्यानंतर उद्योजकांनी मागणी करूनही दर मागे घेण्यात आलेले नाही. त्याचा फटका शासनाला बसला असून, ही जमीन आता वापराविना पडून आहे. राज्यात मुंबई-पुण्याजवळील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये गुंतवणूकदारांनी उद्योजक आणावेत, अशी अपेक्षा असली तरी सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत जमीन उपलब्ध नाही. तसेच सिन्नरच्या सेझ प्रकल्पाचे भिजत घोंगडे असल्याने त्याला पर्याय दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे आठशे एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहीत करण्यात आली आणि त्यापैकी पाचशे एकर क्षेत्रात प्लॉट पाडून भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात दीड ते सहा एकरचे सुमारे पन्नास भूखंड तयार करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या उद्योगांना मागणीप्रमाणे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर उरलेल्या भूखंडावर लघुउद्योजकांना संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २९ जून रोजी भूखंड वाटपाचे दर निश्चित करून जाहीर केले. त्यानुसार पहिल्या सहा महिन्यांसाठी भूखंडाचा दर २३०० रुपये प्रतिचौरस मीटर असा असून त्यानंतर ३ हजार रुपये अशा दराने भूखंड विकले जाणार आहेत. परंतु महामंडळाचे दर अत्यंत जादा असून त्यामुळे उद्योजकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. नाशिक शहरापासून दिंडोरी तालुका हा गुजरात मार्गावर आहे. म्हणजेच मुंबई- आग्रा महामार्गाच्या थेट लगत नाही. त्यातच तळेगाव अक्राळे हे दिंडोरीच्या मध्यवर्तीही नाही अशा अनेक कारणांमुळे उद्योजकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. जून महिन्यात भूखंड खुले केल्यानंतर सहा महिने झाले तरी उद्योजक या वसाहतीचे नाव काढत नसल्याने नव्या वसाहतीची योजना फसली असून आता शासकीय दराबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे. नाशिकमध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी यासाठी पाठपुरावा करणाऱ्या औद्योगिक संघटनांपैकी निमाचे माजी अध्यक्ष रवि वर्मा यांनी सदरचे दर अवास्तव असल्याने ते कमी करावेत, अशी मागणी केली होती. परंतु त्यानंतर या विषयाकडे पुरेसा पाठपुरावा केला गेला नाही. परिणामी शासनाकडून हे दर कायम ठेवल्याने अजूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.