शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डीएड, बीएडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:17 IST

नाशिक : डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. ...

नाशिक : डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत टीईटी-२०२१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षा होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाटीईटी घेण्यात येणार आहे. यावर्षी फॉर्म ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात आलेली नव्हती. मागील प्रत्येकवेळी परीक्षा परिषदने डीएड आणि बीएड शेवटच्या वर्षधारक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येत होती, परंतु यावर्षी ऑनलाइन अर्जामध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. कोरोनामुळे या अभ्यासक्रमाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे संधी नाकारण्यात येत असल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर शासनाने अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद धोरणाशी सुसंगत राहून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेस बसण्यास मुभा देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले

--

जिल्ह्यात डीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी -१२५०

बीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - १७५०

--

५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा करोनामुळे वेळेवर घेण्यात आलेली नाही आणि त्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना महाटीईटी देता येणार नाही आणि त्यानंतर होणारी अभियोग्यता चाचणी तीपण देता येणार नाही, असे सांगत डीएड, बीएएड पात्रताधारक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यात या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थी काय म्हणतात..

---

अंतिम वर्षात टीईटी परीक्षा देता आली तर ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होऊन अभ्यासक्रम पूर्ण होताच नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे अभ्यासाचा सराव असल्याने परीक्षाही सोपी होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.

- अनिकेत जाधव, विद्यार्थी

---

शिक्षक पात्रतेसाठी ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, विद्यार्थी शिक्षण सुरू असताच शिक्षक पात्रता परीक्षाही देऊ शकतील.

- अंजली पवार, विद्यार्थिनी