शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

टॅँकरग्रस्त गावांची प्रांतांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:43 IST

जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर लगेचच मान्सून दाखल झाला. साधारणत: जून महिन्यात पावसाने आपला मुक्काम ठोकल्याने नद्या, नाले पुन्हा वाहू लागले. संपूर्ण महिन्यात सरासरीपेक्षा ११३ टक्के इतका पाऊस झाला, तर जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने १४७ टक्के विक्रमी पाऊस नोंदविला गेला. जून व जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्णात झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील धरणसाठ्यात ७३ टक्के इतकी वाढ झाल्याने पाणीप्रश्न सुटल्याचे चित्र निर्माण झालेले असताना प्रत्यक्षात मात्र बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केइतकाच पाऊस झाला आहे, त्यातही काही विशिष्ट भागातच पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील अन्य भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्णात एकीकडे समाधानकार पाऊस पडत असताना दुसरीकडे पाच तालुक्यातील गाव, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना या टॅँकरला ३० जून नंतर जिल्हाधिकाºयांनी एका महिन्याची (दि. ३१ जुलैपर्यंत) मुदतवाढ दिली. या काळात ४३ गावे, २३ वाड्या अशा एकूण ६६ गावांना २६ टॅँकरच्या ९५ फेºयांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र ३१ जुलै रोजी टॅँकरची मुदतवाढ संपुष्टात आल्याने पुन्हा टॅँकर बंद करण्याची वेळ आली. तथापि, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांना टॅँकर सुरू ठेवा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, अशा गावांमध्ये खरोखरच टॅँकरची गरज आहे काय, हे तपासून पाहण्याच्या सूचना प्रांत तसेच तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.