शहरं
Join us  
Trending Stories
1
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
2
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
3
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
4
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
5
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
6
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
7
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
8
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
9
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
10
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
11
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
13
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
14
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
15
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
16
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
17
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
18
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
19
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
20
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 

टॅँकरग्रस्त गावांची प्रांतांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:43 IST

जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर लगेचच मान्सून दाखल झाला. साधारणत: जून महिन्यात पावसाने आपला मुक्काम ठोकल्याने नद्या, नाले पुन्हा वाहू लागले. संपूर्ण महिन्यात सरासरीपेक्षा ११३ टक्के इतका पाऊस झाला, तर जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने १४७ टक्के विक्रमी पाऊस नोंदविला गेला. जून व जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्णात झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील धरणसाठ्यात ७३ टक्के इतकी वाढ झाल्याने पाणीप्रश्न सुटल्याचे चित्र निर्माण झालेले असताना प्रत्यक्षात मात्र बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केइतकाच पाऊस झाला आहे, त्यातही काही विशिष्ट भागातच पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील अन्य भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्णात एकीकडे समाधानकार पाऊस पडत असताना दुसरीकडे पाच तालुक्यातील गाव, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना या टॅँकरला ३० जून नंतर जिल्हाधिकाºयांनी एका महिन्याची (दि. ३१ जुलैपर्यंत) मुदतवाढ दिली. या काळात ४३ गावे, २३ वाड्या अशा एकूण ६६ गावांना २६ टॅँकरच्या ९५ फेºयांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र ३१ जुलै रोजी टॅँकरची मुदतवाढ संपुष्टात आल्याने पुन्हा टॅँकर बंद करण्याची वेळ आली. तथापि, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांना टॅँकर सुरू ठेवा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, अशा गावांमध्ये खरोखरच टॅँकरची गरज आहे काय, हे तपासून पाहण्याच्या सूचना प्रांत तसेच तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.