शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

टॅँकरग्रस्त गावांची प्रांतांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:43 IST

जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर लगेचच मान्सून दाखल झाला. साधारणत: जून महिन्यात पावसाने आपला मुक्काम ठोकल्याने नद्या, नाले पुन्हा वाहू लागले. संपूर्ण महिन्यात सरासरीपेक्षा ११३ टक्के इतका पाऊस झाला, तर जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने १४७ टक्के विक्रमी पाऊस नोंदविला गेला. जून व जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्णात झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील धरणसाठ्यात ७३ टक्के इतकी वाढ झाल्याने पाणीप्रश्न सुटल्याचे चित्र निर्माण झालेले असताना प्रत्यक्षात मात्र बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केइतकाच पाऊस झाला आहे, त्यातही काही विशिष्ट भागातच पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील अन्य भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्णात एकीकडे समाधानकार पाऊस पडत असताना दुसरीकडे पाच तालुक्यातील गाव, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना या टॅँकरला ३० जून नंतर जिल्हाधिकाºयांनी एका महिन्याची (दि. ३१ जुलैपर्यंत) मुदतवाढ दिली. या काळात ४३ गावे, २३ वाड्या अशा एकूण ६६ गावांना २६ टॅँकरच्या ९५ फेºयांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र ३१ जुलै रोजी टॅँकरची मुदतवाढ संपुष्टात आल्याने पुन्हा टॅँकर बंद करण्याची वेळ आली. तथापि, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांना टॅँकर सुरू ठेवा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, अशा गावांमध्ये खरोखरच टॅँकरची गरज आहे काय, हे तपासून पाहण्याच्या सूचना प्रांत तसेच तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.