शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

४० रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार व भरती केली जाते. विशेष करून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या यात अधिक असते. ग्रामीण ...

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार व भरती केली जाते. विशेष करून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या यात अधिक असते. ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रातच व्हावी, जेणेकरून बाळंतपणात महिला व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. दुर्गम भागातील महिलांना प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात ने-आण करण्यासाठीच या रुग्णवाहिका उपयोगी पडत असल्या तरी, त्याशिवाय गंभीर आजारी रुग्ण, अपघातग्रस्तांसाठीही प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालय वा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिका जीवदान ठरल्या आहेत. साधारणत: एक रुग्णवाहिका दिवसभरातून ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास करते.

-----------

४० रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात

जिल्हा परिषदेच्या ताफ्यात असलेल्या ११२ रुग्णवाहिकांपैकी ४० रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात आली आहे. साधारणत: दहा वर्षे किंवा अडीच लाख किलोमीटरचा प्रवास इतकीच कार्यमर्यादा ठरवून देण्यात आली असून, परंतु रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेवून सध्या या रुग्णवाहिकांचा वापर नाईलाजास्तव केला जात आहे.

---------

नवीन २० रुग्णवाहिका येणार ताफ्यात

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेला निधी बॅँकेत ठेवून त्याच्या व्याजापोटी मिळणाऱ्या रकमेतून कोरोना प्रतिबंधात्मक आर्सेनिक अल्बम खरेदी करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. तथापि, रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेऊन सुमारे अडीच कोटी रुपयांतून २० नवीन रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

-------------

११२ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका

जिल्ह्यातील १९०७ गावांसाठी ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१९ उपकेंद्र असून, या उपकेंद्रांना त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडण्यात आले आहे. या उपकेंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतात.

---------------

दहा ते बारा रुग्णवाहिका रेफर

ग्रामीण रुग्णालयाशी जोडण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ठेवण्यात आलेल्या रुग्णवाहिका गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात ने-आण करण्यासाठी दररोज दहा ते बारा रुग्णवाहिका रेफर केल्या जातात. त्यातून रुग्णांना वेळीच उपचार करण्यास मदत होती.

----------------

विम्याची नेहमीच काळजी

ग्रामीण भागातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वच रुग्णवाहिकांचा विमा काढण्यात आला असून, दरवर्षी या विमा रकमेची परतफेड केली जाते. त्यामुळे रुग्णवाहिकाचा अपघात झाल्यास त्याची भरपाई संबंधित कंपनीकडून केली जाते.

-----------

प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुतांश रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात आली असली तरी, त्यांची देखभाल व दुरूस्ती वेळच्या वेळी केली जाते. परंतु, बऱ्याच वेळा दुरुस्तीसाठी वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने नादुरस्त रुग्णवाहिका आरोग्य केंद्रातच पडून राहते.

- एक चालक

-------------------------

अनेक रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात आली आहे. अशावेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. रुग्णाची परिस्थती पाहून काही वेळा खासगी रुग्णवाहिकांची मदत घेऊन ने-आण करावी लागते.

- एक चालक

--------------------