शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST

नाशिक : कोरोनामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल, मे महिन्यात या परीक्षा होण्याचे संकेत आहेत. ...

नाशिक : कोरोनामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल, मे महिन्यात या परीक्षा होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, तीन महिन्यांवर परीक्षा आल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, यावर्षी कोरोनामुळे दहावी व बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी दिला जात होता. मात्र, यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेले नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. तर या वर्गांतील उपस्थिती वाढण्यासाठी पंधरवड्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे नऊ ते दहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन ते चार महिन्यात कसा पूर्ण होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

दहावीचा अभ्यासक्रम

यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले असले, तरी गणित, विज्ञान यासारखे विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे अवघड आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

बारावीचा अभ्यासक्रम

बारावीच्या अभ्यासक्रमातही यावर्षी कोरोनामुळे २५ टक्के कपात करण्यात आली आहे. बारावीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. प्रत्यक्ष वर्गात शिकवून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. एवढ्या कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, असा प्रश्न विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनाही पडला आहे.

कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले . परंतु, गणित, विज्ञान व इंग्रजीसारखे विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवल्यानंतर चांगले लक्षात राहतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षच प्रभावित झाले असून, उर्वरित दोन महिन्यात अभ्यासक्रम शिकताना समजून घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

- सिद्धार्थ पगार, विद्यार्थी

आता तीन ते चार महिन्यात परीक्षा सुरू होतील. दरवर्षी जानेवारीत उजळणी अभ्यासाला सुरूवात होते. मात्र, यावर्षी अजूनही मूळ अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे आता जलदगतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत करावी लागणार आहे.

- मनिषा जाधव, विद्यार्थिनी

काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नव्हते. तर शाळा सुरू झाल्यानंतरही काही विद्यार्थी उशिराने शाळेत येत आहेत. अशा विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत करावी लागणार आहे. अशा स्थितीत परीक्षा लांबल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

-किशोर पालखेडकर, मुख्याध्यापक

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोरही अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. गणित व विज्ञानबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. हे विषय विद्यार्थ्यांना वर्गातच समजून घ्यावे लागणार आहेत. ऑनलाईनद्वारे कमी प्रमाणात अभ्यासक्रम शिकवला गेल्याने अभ्यासक्रम पूर्ण करतानाही कसरत करावी लागणार आहे, मात्र, अभ्यासक्रमात काही प्रमाणात कपात केल्याने दिलासा मि‌ळाला आहे.

- पुरुषोत्तम रकिबे, राज्याध्यक्ष, शिक्षक विकास संघटना