शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आजपासून दहावीची परीक्षा

By admin | Updated: February 29, 2016 22:53 IST

आज भाषा विषयाचा पेपर; सकाळी ११ वाजता परीक्षा

नाशिक : आज दि. १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून, या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ९४,१६९ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. विभागातील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ८ हजार ६४० इतकी आहे. विभागात सर्वांत कमी विद्यार्थी संख्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक, कॅमेरा पथक आणि बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर पूर्णवेळ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. पहिल्याच दिवशी भाषा या विषयाचा पेपर असून, परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती विभागीय सचिव मारवाडी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९४ हजार १६९ इतकी असून, धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या ३० हजार १७१, जळगाव जिल्ह्यातून ६३,५७९, तर नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या सर्वात कमी २० हजार ७२१ इतकी आहे. विभागातील एकूण विद्यार्थी संख्या २ लाख ८ हजार ६४० इतकी आहे. विभागातील २,६१८ शाळांमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. विभागातील परीक्षा केंद्रांची संख्या ४१३ इतकी आहे, तर जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देतील. विभागात ५८ परीक्षकांची नेमणूक माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात तसेच विभागात कुठेही कॉपीचा गैरप्रकार घडू नये, यासाठी भरारी पथकांची नजर परीक्षा केंद्रांवर असणार आहे.यंदा विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्र नमूद असल्याने विद्यार्थ्यांना केंद्र शोधण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा विभागीय मंडळाने केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दहा मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार असून, याबाबतची माहिती त्यांना शाळास्तरावरच देण्यात आली आहे. बारावी परीक्षेचा अनुभव लक्षात घेता विभागात चारही जिल्ह्यांमध्ये परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, भरारी पथकाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)