शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

दहावी, बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांचे विद्यार्थी व पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक , मुख्याध्यापकांनीही ...

दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांचे विद्यार्थी व पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक , मुख्याध्यापकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र दहावी व बारावीच्या परीक्षांसदर्भात शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेताना कोरोनामुळे ही परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी देतानाच पुढील प्रवेशासाठीही समान संधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे. दरम्यान, दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य लेखी परीक्षेनंतर देण्याची सवलत मिळाली असून या परीक्षा लेखी गृहपाठ पद्धतीने देणे शक्य असल्याने विद्यार्थ्यांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

कोट-१

शालेय शिक्षण विभागाने शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुटसुटीत होणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आपल्या क्रमांकाची शोधाशोध आणि वाहतुकीतून परीक्षा केंद्रावर पोहचण्याचा ताण कमी होणार आहे.

- गुलाब भामरे, मुख्याध्यापाक

कोट- २

प्रत्येक शाळेला केंद्र देणे तसेच विदयार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, परीक्षेचे नियोजन करण्याची जबाबदारी संबधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षण संस्थाचालक, शाळा प्रशासन स्थानिक अथवा जिल्हा असून त्यादृष्टीने संबधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेणे आ‌वश्यक आहे. शिक्षक महासंघाने प्रात्यक्षिक परीक्षा दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेनंतर घेण्याची शासनाने मागणी मान्य केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला वेळ मिळेल.

-संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

कोट-३

शासनाने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळणार आहे. अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने वाढीव वेळेत विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतील.

सुभाष शिंदे, पालक

कोट-४

दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच परीक्षा केंद्र मिळणार असल्याने परीक्षेपूर्वी प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना शाळेसारखेच वातावरण असणार असल्याो त्यांच्यावर परीक्षेता ताण निर्माण होणार नाही. शिवाय प्रवासात कोरोना बाधा होण्याचा भितीही उरणार नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतील.

शीतल जाधव, पालक