शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

दहावी, बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांचे विद्यार्थी व पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक , मुख्याध्यापकांनीही ...

दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांचे विद्यार्थी व पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक , मुख्याध्यापकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र दहावी व बारावीच्या परीक्षांसदर्भात शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेताना कोरोनामुळे ही परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी देतानाच पुढील प्रवेशासाठीही समान संधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे. दरम्यान, दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य लेखी परीक्षेनंतर देण्याची सवलत मिळाली असून या परीक्षा लेखी गृहपाठ पद्धतीने देणे शक्य असल्याने विद्यार्थ्यांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

कोट-१

शालेय शिक्षण विभागाने शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुटसुटीत होणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आपल्या क्रमांकाची शोधाशोध आणि वाहतुकीतून परीक्षा केंद्रावर पोहचण्याचा ताण कमी होणार आहे.

- गुलाब भामरे, मुख्याध्यापाक

कोट- २

प्रत्येक शाळेला केंद्र देणे तसेच विदयार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, परीक्षेचे नियोजन करण्याची जबाबदारी संबधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षण संस्थाचालक, शाळा प्रशासन स्थानिक अथवा जिल्हा असून त्यादृष्टीने संबधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेणे आ‌वश्यक आहे. शिक्षक महासंघाने प्रात्यक्षिक परीक्षा दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेनंतर घेण्याची शासनाने मागणी मान्य केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला वेळ मिळेल.

-संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

कोट-३

शासनाने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळणार आहे. अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने वाढीव वेळेत विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतील.

सुभाष शिंदे, पालक

कोट-४

दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच परीक्षा केंद्र मिळणार असल्याने परीक्षेपूर्वी प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना शाळेसारखेच वातावरण असणार असल्याो त्यांच्यावर परीक्षेता ताण निर्माण होणार नाही. शिवाय प्रवासात कोरोना बाधा होण्याचा भितीही उरणार नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतील.

शीतल जाधव, पालक