शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्तीचे धडे

By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST

वैनतेयच्या विद्यार्थ्यांना मिळाले तणावमुक्तीचे धडे

 

निफाड : येथील वैनतेय विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वैनतेय विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये समुपदेशन विभागाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘तणावमुक्त अभ्यासाचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नाशिक येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आदिती जोशी यांनी विद्यार्थी व पालक यांनी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद पाटील-कराड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, अ‍ॅड. दिलीप वाद्यावकन, किरण कापसे, भालचंद्र मोगल, प्राचार्य के. के. निकम आदि मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना जोशी यांनी सांगितले की, दहावी, बारावीचे वर्ष महत्त्वाचे आहे. हे विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर पालक आणि शिक्षक बिंबवत असतात. त्यामुळे मुले या वर्षांमध्ये एका वेगळ्या चिंतेत वावरू लागतात. वास्तविक सर्वच इयत्ता महत्त्वाच्या असतात. त्यामुळे टेंशन न घेता अभ्यास करा, यश तुमचेच असेल, असेही जोशी यांनी सांगितले. मान्यवर पाहुण्यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)बियाणे कंपनीवर कारवाईची मागणीकनाशी : बोगस सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असून, सदरील कंपनीच्या बियाण्यांची चौकशी करून परवाने रद्द करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. कनाशी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली. बरेच दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी सोयाबीनची बिजे पूर्णपणे अंकुरलीच नाहीत. त्यामुळे त्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट आले असून, बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे आणावे कोठून आणि बियाणे खरेदी करावे तरी कोणते असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.चालू वर्षाच्या हंगामाकरिता सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाली. सोयाबीनचे पीक अल्पकालावधीतील आहे. त्यामुळे सोयाबीन निघाल्यावर दुसरे पीक घेता येत असल्याने शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. ज्या कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे घेतले ते उगवण क्षमतेत अयशस्वी झाले. असे बियाणे परत घेण्यास कृषी केंद्र संचालक नकार देतात व पक्के बिलाची पावती न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तरी सदरील कंपनीच्या बियाण्यांची चौकशी होऊन परवाने रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.