शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीवर्गाची दमछाक

By admin | Updated: October 27, 2015 23:23 IST

वातावरणातील बदल : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सध्या हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीनही ऋतूंचा अनुभव दिवसभरात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे शेतमालाचे संगोपन करताना शेतकरीवर्गाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. पहाटेच्या वातावरणातील गारवा हिवाळा, तर दुपारी उकाडा आणि गरम हवा उन्हाळ्याची आठवण करून देतो. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन रिमझिम कोसळणारा पाऊस पावसाळ्याची अनुभूती देत असतो. चोवीस तासांत तीनही ऋतू नायगाव खोऱ्यात अनुभवास येत आहेत. हवामानात झपाट्याने पडणाऱ्या फरकामुळे रब्बीच्या नियोजनात बिघाड झाला असून, शेतकरीवर्ग संभ्रमात सापडला आहे. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतमालावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिके शेतातच नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. खरिपाचे नुकसान झाल्यानंतर अस्थिर हवामानातच रब्बीच्या पिकांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र वातावरण पूर्वपदावर येण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची निवड करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नायगाव खोऱ्यात खरिपाची सांगता होऊन रब्बीला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने पाण्याची पातळी खालावत असल्यानेच बिघडलेले वातावरण स्वच्छ होत नाही. त्यामुळे कमी पाण्यात येणारे व रोगांचा प्रतिकार करणारी पिकेच डोळ्यासमोर ठेवून शेतकरी रब्बीचे नियोजन करताना दिसत आहेत. सध्या नायगाव खोऱ्यात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कांद्याबरोबर कोबी, फ्लॉवर, टमाटे, मिरची या पिकांचीही परिसरात लागवड केली जाते. वापरलेले भांडवलही न फिटता संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेला आहे. रब्बीलाही सुरुवातीपासून हवामान खराब होत राहिल्याने पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांची पिकांचे नियोजन करताना तारांबळ उडत आहे. वारंवार वातावरणात बदल होत असल्याने मशागतीचे नियोजन खोळंबून पडले आहे. (वार्ताहर)

सकाळपासूनच दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. हवेचे प्रमाण कमी झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक न्हाऊन निघत आहे. ढगाळ हवामानामुळे सूर्य दर्शन होत नसल्याने कोंदट वातावरणामुळे जीवाची लाही लाही होत आहे. त्यामुळे डास, चाचणे व अन्य किटकांचा वावर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.