शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीवर्गाची दमछाक

By admin | Updated: October 27, 2015 23:23 IST

वातावरणातील बदल : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सध्या हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीनही ऋतूंचा अनुभव दिवसभरात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे शेतमालाचे संगोपन करताना शेतकरीवर्गाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. पहाटेच्या वातावरणातील गारवा हिवाळा, तर दुपारी उकाडा आणि गरम हवा उन्हाळ्याची आठवण करून देतो. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन रिमझिम कोसळणारा पाऊस पावसाळ्याची अनुभूती देत असतो. चोवीस तासांत तीनही ऋतू नायगाव खोऱ्यात अनुभवास येत आहेत. हवामानात झपाट्याने पडणाऱ्या फरकामुळे रब्बीच्या नियोजनात बिघाड झाला असून, शेतकरीवर्ग संभ्रमात सापडला आहे. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतमालावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिके शेतातच नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. खरिपाचे नुकसान झाल्यानंतर अस्थिर हवामानातच रब्बीच्या पिकांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र वातावरण पूर्वपदावर येण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची निवड करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नायगाव खोऱ्यात खरिपाची सांगता होऊन रब्बीला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने पाण्याची पातळी खालावत असल्यानेच बिघडलेले वातावरण स्वच्छ होत नाही. त्यामुळे कमी पाण्यात येणारे व रोगांचा प्रतिकार करणारी पिकेच डोळ्यासमोर ठेवून शेतकरी रब्बीचे नियोजन करताना दिसत आहेत. सध्या नायगाव खोऱ्यात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कांद्याबरोबर कोबी, फ्लॉवर, टमाटे, मिरची या पिकांचीही परिसरात लागवड केली जाते. वापरलेले भांडवलही न फिटता संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेला आहे. रब्बीलाही सुरुवातीपासून हवामान खराब होत राहिल्याने पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांची पिकांचे नियोजन करताना तारांबळ उडत आहे. वारंवार वातावरणात बदल होत असल्याने मशागतीचे नियोजन खोळंबून पडले आहे. (वार्ताहर)

सकाळपासूनच दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. हवेचे प्रमाण कमी झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक न्हाऊन निघत आहे. ढगाळ हवामानामुळे सूर्य दर्शन होत नसल्याने कोंदट वातावरणामुळे जीवाची लाही लाही होत आहे. त्यामुळे डास, चाचणे व अन्य किटकांचा वावर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.