शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

शेतकरीवर्गाची दमछाक

By admin | Updated: October 27, 2015 23:23 IST

वातावरणातील बदल : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सध्या हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीनही ऋतूंचा अनुभव दिवसभरात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे शेतमालाचे संगोपन करताना शेतकरीवर्गाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. पहाटेच्या वातावरणातील गारवा हिवाळा, तर दुपारी उकाडा आणि गरम हवा उन्हाळ्याची आठवण करून देतो. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन रिमझिम कोसळणारा पाऊस पावसाळ्याची अनुभूती देत असतो. चोवीस तासांत तीनही ऋतू नायगाव खोऱ्यात अनुभवास येत आहेत. हवामानात झपाट्याने पडणाऱ्या फरकामुळे रब्बीच्या नियोजनात बिघाड झाला असून, शेतकरीवर्ग संभ्रमात सापडला आहे. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतमालावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिके शेतातच नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. खरिपाचे नुकसान झाल्यानंतर अस्थिर हवामानातच रब्बीच्या पिकांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र वातावरण पूर्वपदावर येण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची निवड करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नायगाव खोऱ्यात खरिपाची सांगता होऊन रब्बीला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने पाण्याची पातळी खालावत असल्यानेच बिघडलेले वातावरण स्वच्छ होत नाही. त्यामुळे कमी पाण्यात येणारे व रोगांचा प्रतिकार करणारी पिकेच डोळ्यासमोर ठेवून शेतकरी रब्बीचे नियोजन करताना दिसत आहेत. सध्या नायगाव खोऱ्यात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कांद्याबरोबर कोबी, फ्लॉवर, टमाटे, मिरची या पिकांचीही परिसरात लागवड केली जाते. वापरलेले भांडवलही न फिटता संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेला आहे. रब्बीलाही सुरुवातीपासून हवामान खराब होत राहिल्याने पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांची पिकांचे नियोजन करताना तारांबळ उडत आहे. वारंवार वातावरणात बदल होत असल्याने मशागतीचे नियोजन खोळंबून पडले आहे. (वार्ताहर)

सकाळपासूनच दमट हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. हवेचे प्रमाण कमी झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक न्हाऊन निघत आहे. ढगाळ हवामानामुळे सूर्य दर्शन होत नसल्याने कोंदट वातावरणामुळे जीवाची लाही लाही होत आहे. त्यामुळे डास, चाचणे व अन्य किटकांचा वावर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.