शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

कलेचे मंदिर कलेलाच मारक ठरायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:00 IST

नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे अव्वाच्या सव्वा भाडे वाढविण्यात आले आहे. या गोष्टीला रंगकर्मींच्या वर्तुळातून विरोध होत आहे.

ठळक मुद्देकालिदास कलामंदिर : दरवाढीमुळे रंगकर्मी संतप्त

नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे अव्वाच्या सव्वा भाडे वाढविण्यात आले आहे. या गोष्टीला रंगकर्मींच्या वर्तुळातून विरोध होत आहे.कालिदासची दरवाढ झाल्याने आजवर जोपासले जाणारे कलेचे वातावरण क्षणात नाहीसे होऊन तेथे व्यावसायिकता वाढीस लागणार आहे. याचा फटका नाट्यकर्मींना तर बसेलच पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे कालिदासची भाडेवाढ मागे घ्यावी, अशा भावना कलाकार, दिग्दर्शक आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद.कालिदासची भाडेवाढ एवढी करायला नको. येथे आधी जेवढे प्रयोग व्हायचे, प्रायोगिक नाटकांसाठी ज्या सवलती दिल्या जायच्या त्यामुळे नाट्यकलेचे संवर्धन होत होते. ते आता होणार नाही. त्यामुळे ही भाडेवाढ मागे घेतलीच पाहिजे.- गणेश सरकाटे, नाट्य व दूरचित्रवाणी अभिनेतामहाकवी कालिदास कलामंदिरचे वाढवलेले भाडे फारच जास्त आहे. मी पुणे, मुंबई येथेही नाट्यप्रयोग करतो. पण तिथलेही दर इतके जास्त दिसत नाहीत. कालिदासला वाढ करायचीच होती तर टप्प्याटप्प्याने करायची होती. एकदम करायला नको होती. मी एका स्पर्धेसाठी नुकताच नंदुरबारला गेलो होतो. तेथील नाट्यगृहात सकाळ सत्रासाठी ११ हजार रुपये भाडे वाढविण्यात आले. आता त्या नाट्यगृहात नाटक वगैरे होतच नाही. फक्त शोकसभा, संमेलने वगैरेसारखे कार्यक्रम होतात. ही गत कालिदासची व्हायला नको.- विक्रम गवांदे, दिग्दर्शककालिदासचे वाढलेले भाडे कुणालाच परवडणारे नाही. यातून स्थानिक कलाकार, हौशी रंगकर्मी यांना तर काही संधीच राहणार नाही. हौशी नाट्यकर्मींना एवढे पैसे देऊन नाटक करणे शक्य नसते. त्यातून कलेला वावच रहाणार नाही. ही भाडेवाढ मागे घेतली गेली पाहिजे.- अपूर्वा कुबल, कलाकार, लोकहितवादी संघकालिदास कलामंदिरची भाडेवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात का, कुणी केली, कुणाशी चर्चा करून केली हेच समजत नाही. शहरात तीन चांगल्या नाट्यगृहांची गरज असताना आणि आता नूतनीकरण झाले असताना अचानक एवढी भाडेवाढ करणे अयोग्य आहे. यामुळे शहरातल्या सांस्कृतिक वातावरणाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. नाशिककरांना अशी स्मार्ट सिटी मिळणार असेल तर ती नको आहे. महापालिकेने सांस्कृतिक गरज म्हणून कालिदासकडून आर्थिक फायद्याची अपेक्षा ठेवली नाही तर काय हरकत आहे?- सचिन शिंदे, अभिनेता, दिग्दर्शकनाट्यगृहाचे भाडे किती असावे ते ठरवण्याचे, ते योग्य पद्धतीने आकारण्याचे काम त्या त्या ठिकाणचे सत्ताधारी, प्रशासनाधिकारी करत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून बघावा. पण हौशी रंगकर्मींच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही निवेदन देऊन, पाठपुरावा करू. हौशी रंगकर्मींना किती दिवस मोफत नाट्यगृह देणार? काय काय सुविधा देणार हे बघितले जाईल. शासनाच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांच्याबरोबर बोलून, त्यांना पटवून देऊन आपण आपला प्रामाणिक हेतू साध्य करून घेऊ शकतो, असे मला वाटते.- नूपुर सावजी, नाट्य व सिने कलाकार