शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

तांत्रिक समितीने फिरविली पाठ

By admin | Updated: November 18, 2016 00:04 IST

तलाठी दिवसभर ताटकळले : आंदोलन कायम, सर्व्हरचा त्रास होत असल्याची तक्रार

 नाशिक : तलाठी सजांची पुनर्रचना, मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा विस्तार व संगणकीय कामकाज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे पंधरा हजार तलाठी, मंडळ अधिकारी बुधवारपासून संपावर गेलेले असताना त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी येणाऱ्या शासनाच्या समितीनेही नाशिककडे पाठ फिरविल्याने जो संगणकीय अडचणींचा सामना तलाठ्यांना करावा लागतो, तसाच समितीच्या लहरी कारभाराचा अनुभव त्यांना घ्यावा लागला आहे. सोमवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत बैठक घेऊन तलाठ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने संगणकीय कामकाज करताना म्हणजेच सातबारा उताऱ्याची नोंद, फेरफार नोंदी आदि बाबी संगणकात नोंद करताना सर्व्हरचा त्रास होत असल्याची मुख्य तक्रार तलाठी संघटनेने केली होती. इंटरनेटची जोडणी नसणे, असलीच तर त्याला स्पीड नसणे यासारख्या गोष्टींमुळे कामकाजाची गती कमी होत असल्याने सर्व्हरचे प्रमाण वाढवून मिळावे, अशी त्यांची मुख्य मागणी होती. महसूलमंत्र्यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी व वास्तव तपासून पाहण्यासाठी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञ तसेच राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तलाठ्यांना कामकाजात येणाऱ्या अडचणी व तांत्रिक दोषाबाबत माहिती गोळा करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातूनच या संदर्भात अधिक तक्रारी येत असल्याने या समितीने आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नाशिकपासूनच करण्याचे ठरविले होते व त्यासाठी गुरुवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही समिती भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व तलाठ्यांशी चर्चा करणार होती. या चर्चेसाठी सकाळी नऊ वाजेपासूनच तलाठी व मंडळ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तथापि, सायंकाळपर्यंत या समितीचे नाशकात आगमनच न झाल्याने अखेर वैतागलेल्या तलाठ्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, बुधवारपासून सुरू झालेले तलाठ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने त्याचा परिणाम दिसू लागला आहे. (प्रतिनिधी)