शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

संत तुकारामांच्या अभंगात तथागत बुद्धांचीच शिकवण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनातून मांडलेली समतामूलक समाजाची संकल्पना तसेच मानवता, समानता आणि कर्मकांडाला विरोध आदी ...

नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनातून मांडलेली समतामूलक समाजाची संकल्पना तसेच मानवता, समानता आणि कर्मकांडाला विरोध आदी विचारांचा वारसा पुढे सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांतून मांडून एक नवी क्रांती केली', असे विचार हभप किरणमाऊली पगार यांनी मांडले. ते परिवर्तन परिवाराच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्ताने आयोजित भगवान गौतम बुद्ध ते संत तुकाराम या विषयावरील व्याख्यान प्रसंगी बोलत होते. संत तुकारामांनी अभंगांव्दारे मांडलेले आपले विचार व बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी केलेले कार्य यात एकसमानतेचा धागा आढळून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. संत नामदेव, संत एकनाथ आदींनीही बुद्धांचे स्तुतीपर अभंग रचल्याचे दाखले त्यांनी दिले. विशेष म्हणजे या दोन्ही महापुरुषांनी आपले विचार हे तत्कालीन भाषेत म्हणजेच पाली आणि प्राकृत मराठी भाषेतच मांडून समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढले. बुद्धाने 'कर्ममार्ग' सांगितला, तर तुकारामाने 'भक्तिमार्ग' सांगितला, असेही किरण पगार यांनी नमूद केले.

ऑनलाइन झालेल्या या व्याख्यान कार्यक्रमात परिवर्तनचे सचिव प्राचार्य दिनकर पवार यांनी प्रास्ताविकाद्वारे भूमिका मांडली. परिवर्तन परिवाराचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे यांनी डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे घोषित केली. या व्याख्यानास करुणासागर पगारे, नितीन बागुल, ॲड. बनसोडे, शिक्षक नेते के.के. अहिरे, साहेबराव कुटे, निलेश ठाकूर, बाळासाहेब सोनवणे, संजय पवार, प्रकाश पानपाटील, महेश अहिरे, संजय पाटील, कवी रवींद्र मालुंजकर, नानासाहेब पटाईत आदींसह अनेकांनी उपस्थिती लावली. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन रोहित गांगुर्डे यांनी केले.