शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

संत तुकारामांच्या अभंगात तथागत बुद्धांचीच शिकवण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनातून मांडलेली समतामूलक समाजाची संकल्पना तसेच मानवता, समानता आणि कर्मकांडाला विरोध आदी ...

नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनातून मांडलेली समतामूलक समाजाची संकल्पना तसेच मानवता, समानता आणि कर्मकांडाला विरोध आदी विचारांचा वारसा पुढे सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांतून मांडून एक नवी क्रांती केली', असे विचार हभप किरणमाऊली पगार यांनी मांडले. ते परिवर्तन परिवाराच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्ताने आयोजित भगवान गौतम बुद्ध ते संत तुकाराम या विषयावरील व्याख्यान प्रसंगी बोलत होते. संत तुकारामांनी अभंगांव्दारे मांडलेले आपले विचार व बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी केलेले कार्य यात एकसमानतेचा धागा आढळून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. संत नामदेव, संत एकनाथ आदींनीही बुद्धांचे स्तुतीपर अभंग रचल्याचे दाखले त्यांनी दिले. विशेष म्हणजे या दोन्ही महापुरुषांनी आपले विचार हे तत्कालीन भाषेत म्हणजेच पाली आणि प्राकृत मराठी भाषेतच मांडून समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढले. बुद्धाने 'कर्ममार्ग' सांगितला, तर तुकारामाने 'भक्तिमार्ग' सांगितला, असेही किरण पगार यांनी नमूद केले.

ऑनलाइन झालेल्या या व्याख्यान कार्यक्रमात परिवर्तनचे सचिव प्राचार्य दिनकर पवार यांनी प्रास्ताविकाद्वारे भूमिका मांडली. परिवर्तन परिवाराचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे यांनी डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे घोषित केली. या व्याख्यानास करुणासागर पगारे, नितीन बागुल, ॲड. बनसोडे, शिक्षक नेते के.के. अहिरे, साहेबराव कुटे, निलेश ठाकूर, बाळासाहेब सोनवणे, संजय पवार, प्रकाश पानपाटील, महेश अहिरे, संजय पाटील, कवी रवींद्र मालुंजकर, नानासाहेब पटाईत आदींसह अनेकांनी उपस्थिती लावली. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन रोहित गांगुर्डे यांनी केले.