शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पालिकेत शिक्षक समायोजन घोटाळा

By admin | Updated: June 14, 2014 01:59 IST

महापालिकेत १९९९ ते २०१३ या कालावधीत शेकडो शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या झाल्याचा गंभीर प्रकार नाशिक : माकपाचे गटनेते तानाजी जायभावे यांनी उघडकीस आणला आहे.

नाशिक : वर्ग-३ आणि ४ च्या शिक्षकांची बदली करताना पालिकाबाह्य शिक्षकांचा त्यात समावेश करू नये, तसेच शिक्षकांची बदली करताना महासभेच्या मान्यतेशिवाय त्यास मूर्त स्वरूप देऊ नये असे आदेश असताना ते धाब्यावर बसवून महापालिकेत १९९९ ते २०१३ या कालावधीत शेकडो शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या झाल्याचा गंभीर प्रकार माकपाचे गटनेते तानाजी जायभावे यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तत्कालीन शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी वसुधा कुरणावळ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुरणावळ यांच्या कारकीर्दीत सन २०१३ पर्यंत अशा सुमारे २५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, त्या करताना शासकीय आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप होतो आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची इतर शासनमान्य संस्थांमध्ये बदली करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश असताना ते धाब्यावर बसविण्यात आले. जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षकांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. असे करताना तत्कालीन शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी डॉ. वसुधा कुरणावळ यांनी महासभेला तर अंधारात ठेवलेच दुसरीकडे आयुक्तांची मान्यता घेणाऱ्या पत्रकात वारंवार खाडाखोड करून आयुक्तांचीही दिशाभूल केल्याचा आरोप जायभावे यांनी केला आहे. यासंदर्भात नोव्हेंबर १३ या महिन्यात आयुक्तांकडे सादर केलेल्या पती-पत्नी एकत्रीकरण यादीत समावेश केलेल्या शिक्षकांच्या यादीत अनेक नावे घुसविण्यासाठी वारंवार खाडाखोड केल्याचे दिसत असून, त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्याचा कुरणावळ यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जायभावे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)