शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

पालिकेत शिक्षक समायोजन घोटाळा

By admin | Updated: June 14, 2014 01:59 IST

महापालिकेत १९९९ ते २०१३ या कालावधीत शेकडो शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या झाल्याचा गंभीर प्रकार नाशिक : माकपाचे गटनेते तानाजी जायभावे यांनी उघडकीस आणला आहे.

नाशिक : वर्ग-३ आणि ४ च्या शिक्षकांची बदली करताना पालिकाबाह्य शिक्षकांचा त्यात समावेश करू नये, तसेच शिक्षकांची बदली करताना महासभेच्या मान्यतेशिवाय त्यास मूर्त स्वरूप देऊ नये असे आदेश असताना ते धाब्यावर बसवून महापालिकेत १९९९ ते २०१३ या कालावधीत शेकडो शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या झाल्याचा गंभीर प्रकार माकपाचे गटनेते तानाजी जायभावे यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तत्कालीन शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी वसुधा कुरणावळ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुरणावळ यांच्या कारकीर्दीत सन २०१३ पर्यंत अशा सुमारे २५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, त्या करताना शासकीय आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप होतो आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची इतर शासनमान्य संस्थांमध्ये बदली करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश असताना ते धाब्यावर बसविण्यात आले. जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षकांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. असे करताना तत्कालीन शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी डॉ. वसुधा कुरणावळ यांनी महासभेला तर अंधारात ठेवलेच दुसरीकडे आयुक्तांची मान्यता घेणाऱ्या पत्रकात वारंवार खाडाखोड करून आयुक्तांचीही दिशाभूल केल्याचा आरोप जायभावे यांनी केला आहे. यासंदर्भात नोव्हेंबर १३ या महिन्यात आयुक्तांकडे सादर केलेल्या पती-पत्नी एकत्रीकरण यादीत समावेश केलेल्या शिक्षकांच्या यादीत अनेक नावे घुसविण्यासाठी वारंवार खाडाखोड केल्याचे दिसत असून, त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्याचा कुरणावळ यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जायभावे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)