शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

टीबी रुग्णांचा पोषण भत्त्याचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST

नाशिक : महागड्या औषधांसाठी उपचारांकडे पाठ फिरविणाऱ्या रुग्णांना उपचारांच्या मार्गावर आणण्यासाठी दिला जाणारा भत्ता आता खासगी रुग्णालयातील क्षयरुग्णांनाही देण्याचा ...

नाशिक : महागड्या औषधांसाठी उपचारांकडे पाठ फिरविणाऱ्या रुग्णांना उपचारांच्या मार्गावर आणण्यासाठी दिला जाणारा भत्ता आता खासगी रुग्णालयातील क्षयरुग्णांनाही देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी शासनाकडून घेण्यात आला होता. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या औषधातही खंड पडू नये, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मात्र यंत्रणेलाच विसर पडल्याने पोषण भत्त्याचा विसर पडल्याने त्यांना पोषण भत्ताच मिळालेला नाही. सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांपैकी चोवीस हजार रुग्णांनी खाते क्रमांकच दिलेला नाही. त्यामुळे तेदेखील या भत्त्यापासून वंचित राहिले आहेत.

क्षयरुग्णांसाठी सरकारने योजना हाती घेतल्या असल्या तरी उपचारांपासून दूर जाणारे रुग्ण हा त्यातील सर्वांत मोठा अडथळा ठरतो. सरकारी रुग्णालयात हे उपचार मोफत होत असले तरी खासगी रुग्णालयांची निवड करीत कालांतराने महागड्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांतर्फे नोंदविले जाते. मात्र, उपचार अर्धवट सोडल्याने क्षयरोगाचा संसर्ग अधिक होतो. अशा रुग्णांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दर महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये देण्याची योजना सरकारतर्फे राबविली जात होती. यापूर्वी केवळ शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना हा आर्थिक लाभ दिला जात होता. मात्र, आता सरकारने याबाबतची नवी नियमावली नुकतीच लागू केली असून, त्यानुसार खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही दर महिन्याला पाचशे रुपये दिले जाणार आहेत.

पोषक आहाराची गरज

क्षयाच्या रुग्णांना औषधांसह पोषक आहाराची गरज असते. पोषक आहार आणि औषधे यांचा समन्वय साधून या रोगावर मात करता येत असल्याने प्रत्येक गरजू रुग्णाला पोषक आहार देण्याचा प्रयत्न सुरुवातीला शासकीय पातळीवर केला जात होता. मात्र, आहाराऐवजी रुग्णाच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी शासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र, आता अशा रुग्णांची नोंदणीच होत नसल्याने त्यांना पोषण आहार मिळणेच बंद झाले आहे.

उपचार पूर्ण मोफत

सर्व रुग्णांना उपचार मिळत आहेत. या धोरणामुळेही क्षयरुग्णांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळत आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची सरकारी दवाखान्यात मोफत थुंकी तपासणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची एक्स रे तपासणीदेखील मोफत केली जात आहे. या व्यतिरिक्त क्षयरोगावरील औषधोपचार व तपासणीबाबत माहिती देण्यासाठी टोल फ्री सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर संबंधितांना क्षयरोगाबाबत माहिती दिली जात आहे.

क्षयरोगाची लक्षणे

क्षयरोग हा ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरकोलोसिस’ या जीवाणुंमुळे होतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, भूक न लागणे, सातत्याने वजन कमी होणे, ताप येणे ही काही क्षयरोगाची लक्षणे आहेत. क्षयरोगाची तपासणी होऊन नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग हा सहा महिन्यांतदेखील पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे आता सर्वसामान्यांनादेखील समजले आहे. त्यामुळेच क्षयरोगाची जनमानसावरील धास्ती कमी झाली आहे.