शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा एनबीटीवर भरवसा नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:14 IST

नाशिक : ‘सोनू तुझा मायावर भरवसा न्हाय काय?’ या गाण्याचे विडंबन करून भल्ल्या-भल्ल्यांची पोलखोल केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘सोनू तुझा मायावर भरवसा न्हाय काय?’ या गाण्याचे विडंबन करून भल्ल्या-भल्ल्यांची पोलखोल केली जात आहे. आता विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही याचा आधार घेत महाविद्यालय अन् विद्यापीठाच्या गलथान कारभाराकडे लक्ष वेधले आहे. महाविद्यालयाच्या ऐन प्रवेशद्वारावर भले मोठे फलक लावून त्यावर ‘विद्यार्थी तुमचा एनबीटीवर भरवसा नाय काय... नाय काय?’ अशा ओळीत विद्यार्थ्यांनी निकालाविषयी भावना व्यक्त केल्या आहे. सध्या हे फलक कॉलेजरोड परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच बीएसएल एलएलबी, बीए एलएलबी आणि एलएलबी पदवीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे; मात्र या निकालात प्रचंड गोंधळ आणि चुकांची शंभरी गाठलेली असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. या शिक्षणक्रमांचे निकाल नुकतेच लागले. त्यावेळी तेव्हा बरेचसे विद्यार्थी मोजक्याच विषयात अनुत्तीर्ण असल्याची बाब समोर आली. त्यामुळे महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स विद्यापीठाकडून मागविल्या. जेव्हा या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्या तेव्हा त्यामध्ये विद्यापीठाने केलेला कारभार उघड झाला. कारण गुणदान देताना ३५ ते ४० गुणांच्या बेरजेमध्येच घोळ केल्याचे समोर आले. बहुतांश विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या मधल्या पानांवर विद्यार्थ्यांना ४० ते ४५ गुण दिले गेले; मात्र उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर केवळ २५ गुण दिले.  याचा परिणाम म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली असून, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नेहमीच्या पठडीतील उत्तरे दिली आहेत. शिवाय आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे; मात्र यावर तोडगा केव्हा निघेल याबाबत मात्र साशंकता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने केलेल्या चुका दुरुस्त न केल्यास याबाबतचे विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याचीही शक्यता आहे.  त्याच पार्श्वभूमीवर या गलथान कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी अशा उपरोधीक फलकाचा आधार घेतला आहे. बहुचर्चित ‘सोनू’गीताच्या बोलातून महाविद्यालय प्रशासन आणि विद्यापीठावर निशाणा साधला आहे. बुधवारी सकाळी महाविद्यालयाच्या समोरील दर्शनीभागात हा फलक लागला तेव्हा विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले आणि कॉलेजरोड परिसरात हा चर्चेचा विषय ठरला. आता एनबीटी विद्यार्थ्यांचा भरवसा किती टिकवते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.