शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

निर्बंध शिथिलतेबाबत टास्क फोर्सचा निर्णय अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर आल्याने नाशिक जिल्ह्याला निर्बंधातून दिलासा मिळावा याबाबत राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे प्रस्ताव ...

नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर आल्याने नाशिक जिल्ह्याला निर्बंधातून दिलासा मिळावा याबाबत राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. निर्बंध शिथिलतेबाबत टास्फ फोर्सचा निर्णय अंतिम राहाणार असून त्यानुसारच कार्यवाही केली जाईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या दोन दिवसात याबाबतचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. तत्पूर्वी गेल्या दोन महिन्यांपासून निर्बंधाचे पालन केले जात आहे. जिल्ह्यातील कोरेानाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्हिटी रेट अवघा दोन टक्के इतका आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्याबाबतची शिफारस जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या आदेशाने शासनाला केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चादेखील झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मात्र याबाबचे अधिकृत आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याने तूर्तास जिल्ह्यातील निर्बंध कायम राहाणार आहे. पुढील दोन दिवसात टास्क फोर्सकडून याबाबतचे आदेश प्राप्त होऊ शकतात असेही भुजबळ यांनी सांगितले. वीकेण्ड लॉकडाऊन आणि दुकानांच्या वेळेबाबत आपण केलेल्या शिफारशीनुसार सकारात्मक निर्णय जरी झाला असला तरी जिल्ह्यातील त्यावेळची परिस्थिती पाहून काही निर्बंध आपण कायम ठेवू शकतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

---इन्फो---

धोका टळलेला नाही

निर्बंधात सूट देण्याबाबतचा निर्णय एका आदेशाने लागलीच होऊ शकतो मात्र पुन्हा निर्बंध लावणे कठीण असते असा पुनरुच्चार भुजबळ यांनी यावेळी केला. अमेरिका, ब्रिटन या सारख्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. केरळमध्ये गेल्या चोवीस तासात विक्रमी कोरेाना रुग्ण आढळल्याने दोन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे धोका अजूनही टळलेला नाही. केंद्र सरकारनेदेखील काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.

--इन्फो--

पाणी कपातीचा निर्णय मनपाच घेईल

गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढला असल्याने शहरात लागू करण्यात आलेला पाणी कपातीचा निर्णय महापालिका प्रशासनच घेईल असेही भुजबळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडत असला तरी अनेक तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.