शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

निर्बंध शिथिलतेबाबत टास्क फोर्सचा निर्णय अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर आल्याने नाशिक जिल्ह्याला निर्बंधातून दिलासा मिळावा याबाबत राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे प्रस्ताव ...

नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर आल्याने नाशिक जिल्ह्याला निर्बंधातून दिलासा मिळावा याबाबत राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. निर्बंध शिथिलतेबाबत टास्फ फोर्सचा निर्णय अंतिम राहाणार असून त्यानुसारच कार्यवाही केली जाईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या दोन दिवसात याबाबतचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. तत्पूर्वी गेल्या दोन महिन्यांपासून निर्बंधाचे पालन केले जात आहे. जिल्ह्यातील कोरेानाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्हिटी रेट अवघा दोन टक्के इतका आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्याबाबतची शिफारस जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या आदेशाने शासनाला केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चादेखील झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मात्र याबाबचे अधिकृत आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याने तूर्तास जिल्ह्यातील निर्बंध कायम राहाणार आहे. पुढील दोन दिवसात टास्क फोर्सकडून याबाबतचे आदेश प्राप्त होऊ शकतात असेही भुजबळ यांनी सांगितले. वीकेण्ड लॉकडाऊन आणि दुकानांच्या वेळेबाबत आपण केलेल्या शिफारशीनुसार सकारात्मक निर्णय जरी झाला असला तरी जिल्ह्यातील त्यावेळची परिस्थिती पाहून काही निर्बंध आपण कायम ठेवू शकतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

---इन्फो---

धोका टळलेला नाही

निर्बंधात सूट देण्याबाबतचा निर्णय एका आदेशाने लागलीच होऊ शकतो मात्र पुन्हा निर्बंध लावणे कठीण असते असा पुनरुच्चार भुजबळ यांनी यावेळी केला. अमेरिका, ब्रिटन या सारख्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. केरळमध्ये गेल्या चोवीस तासात विक्रमी कोरेाना रुग्ण आढळल्याने दोन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे धोका अजूनही टळलेला नाही. केंद्र सरकारनेदेखील काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.

--इन्फो--

पाणी कपातीचा निर्णय मनपाच घेईल

गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढला असल्याने शहरात लागू करण्यात आलेला पाणी कपातीचा निर्णय महापालिका प्रशासनच घेईल असेही भुजबळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडत असला तरी अनेक तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.