शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली की मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:10 IST

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

नाशिक : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़  तारवालानगर चौफुलीवर शुक्रवारी (दि़११) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मार्केट यार्डाकडून भरधाव आलेल्या एस.क्रॉस (एमएच १५, जीए ५६५७) या वाहनचालकाने दिलेल्या जबर धडकेत वॅगनआर कार (एमएच ४३, ए ८९०६) उलटली व सुमारे पंधरा फूट घसरत गेली़ सुदैवाने या अपघातात वॅगन आरमधील महिला व लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात उत्तमराव देवरे (रा़ मातोश्रीनगर, विजयनगर, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार एसक्रॉसवरील वाहनचालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर अमृतधाम चौफुलीकडून येणारे, दिंडोरीरोड, मार्केट यार्ड तसेच नाशिककडून म्हसरूळ दिंडोरी रोडकडे वाहने जातात़ या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़ या चौफुलीवर वाहतूक पोलीस हे केवळ दंडवसुलीसाठी नियुक्त केले आहेत की काय असे चित्र असते़ त्यामुळे या ़ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच मुंबई-आग्रा रोडवर एकाच ठिकाणी टाकलेले पाच-सहा एकत्रित गतिरोधक बसवावे जेणेकरून प्रत्येक वाहनधारक या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करेल व अपघातांची संख्या कमी होईल़ तारवालानगर चौफुलीवर पूर्वी वळणरोड लहान असल्याने लावण्यात आलेली सिग्नल यंत्रणा तसेच वृक्षावर वाहने आदळल्याच्या घटना घडलेल्या असून, अनेकांचे जीवही गेलेले आहेत़ त्यानंतर रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रात्रीच्या वेळी या चौफुलीवरून भरधाव वाहने धावत असल्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून चौफु ली पार करावी लागते़ या ठिकाणी स्थानिक मित्रमंडळाने सीसीटीव्ही यंत्रणाही बसविलेली आहे, याद्वारे किमान कोणत्या वाहनधारकाची चूक आहे हे पोलिसांच्या लक्षात येते़विशेष म्हणजे याच रस्त्यावर नाशिक नगरीच्या महापौर दररोज ये-जा करतात़ मात्र, त्यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या अपघातप्रवण चौफुलीबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचत नाही, याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा