शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली की मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:10 IST

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

नाशिक : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़  तारवालानगर चौफुलीवर शुक्रवारी (दि़११) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मार्केट यार्डाकडून भरधाव आलेल्या एस.क्रॉस (एमएच १५, जीए ५६५७) या वाहनचालकाने दिलेल्या जबर धडकेत वॅगनआर कार (एमएच ४३, ए ८९०६) उलटली व सुमारे पंधरा फूट घसरत गेली़ सुदैवाने या अपघातात वॅगन आरमधील महिला व लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात उत्तमराव देवरे (रा़ मातोश्रीनगर, विजयनगर, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार एसक्रॉसवरील वाहनचालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर अमृतधाम चौफुलीकडून येणारे, दिंडोरीरोड, मार्केट यार्ड तसेच नाशिककडून म्हसरूळ दिंडोरी रोडकडे वाहने जातात़ या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़ या चौफुलीवर वाहतूक पोलीस हे केवळ दंडवसुलीसाठी नियुक्त केले आहेत की काय असे चित्र असते़ त्यामुळे या ़ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच मुंबई-आग्रा रोडवर एकाच ठिकाणी टाकलेले पाच-सहा एकत्रित गतिरोधक बसवावे जेणेकरून प्रत्येक वाहनधारक या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करेल व अपघातांची संख्या कमी होईल़ तारवालानगर चौफुलीवर पूर्वी वळणरोड लहान असल्याने लावण्यात आलेली सिग्नल यंत्रणा तसेच वृक्षावर वाहने आदळल्याच्या घटना घडलेल्या असून, अनेकांचे जीवही गेलेले आहेत़ त्यानंतर रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रात्रीच्या वेळी या चौफुलीवरून भरधाव वाहने धावत असल्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून चौफु ली पार करावी लागते़ या ठिकाणी स्थानिक मित्रमंडळाने सीसीटीव्ही यंत्रणाही बसविलेली आहे, याद्वारे किमान कोणत्या वाहनधारकाची चूक आहे हे पोलिसांच्या लक्षात येते़विशेष म्हणजे याच रस्त्यावर नाशिक नगरीच्या महापौर दररोज ये-जा करतात़ मात्र, त्यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या अपघातप्रवण चौफुलीबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचत नाही, याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा