शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कांद्याच्या भाववाढीवरून बैठकीत ताणाताणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:56 IST

मध्य तसेच आंध्र प्रदेशमधून कांद्याची मागणी वाढल्यामुळे जिल्ह्यातील कांद्याला चांगले भाव मिळू लागताच केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास तसेच भाववाढीस व्यापाºयांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे़ त्याचे पडसाद गुरुवारी बाजार समित्या व व्यापाºयांच्या बैठकीत उमटले. वाढत्या भावाची चर्चा होत असेल तर नुकसानग्रस्त शेतकºयांचाही विचार करून शेतीमालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आल्याने जिल्हाधिकारी व माजी आमदारामध्ये शाब्दिक चकमक झडली.

नाशिक : मध्य तसेच आंध्र प्रदेशमधून कांद्याची मागणी वाढल्यामुळे जिल्ह्यातील कांद्याला चांगले भाव मिळू लागताच केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास तसेच भाववाढीस व्यापाºयांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे़ त्याचे पडसाद गुरुवारी बाजार समित्या व व्यापाºयांच्या बैठकीत उमटले. वाढत्या भावाची चर्चा होत असेल तर नुकसानग्रस्त शेतकºयांचाही विचार करून शेतीमालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आल्याने जिल्हाधिकारी व माजी आमदारामध्ये शाब्दिक चकमक झडली.गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकच्या सतराही बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगल्या प्रकारे होत असून, साधारणत: १७०० ते २२०० रुपयांपर्यंत शेतकºयांना भाव मिळू लागला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याने चांगला भाव दिल्यामुळे शेतकरी खुशीत असतानाच कांद्याच्या खुल्या बाजारातील चढ्या भावामुळे केंद्र व राज्य सरकार गंभीर झाले आहे. सरकारच्या मते शेतकºयांकडून कांदा खरेदी करून व्यापारी त्याची साठवणूक करून ठेवत असून, त्यामुळे बाजारात कांद्याची कृत्रीम टंचाई निर्माण होते व मागणी वाढली की कांदा जादा भावाने विक्री केला जातो. त्यामुळे कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना शासनाने दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी जिल्ह्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापाºयांची बैठक बोलविली होती. या बैठकीत व्यापाºयांनी कांद्याची साठवणूक करू नये, अशी अपेक्षा जिल्हाधिकाºयांनी व्यक्त करताच, माजी आमदार दिलीप बनकर यांनी, कांद्याची इतर राज्यात मागणी वाढल्यामुळे भाव वाढले आहेत, ज्या ज्या वेळी कांद्याला चांगला भाव मिळतो त्या त्यावेळी सरकार व्यापाºयांवर कारवाई करते तसेच भाव कमी व्हावेत म्हणून उपायोजना करत असेल तर ज्यावेळी शेतकºयाला भाव मिळत नाही व त्याचे नुकसान होते त्यावेळी मग सरकार भरपाई का देत नाही? सरकारने अगोदर शेतमालाला हमी भाव द्यावा व कांद्याला पाहिजे असेल तर जीवनावश्यक वस्तुंच्या यादीत टाकावे, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी बैठक हमी भावासाठी नसल्याचे स्पष्ट केल्याने शब्दाने शब्द वाढत गेला. तणाव निर्माण होत असल्याचे पाहून इतरांनी मध्यस्थी केल्याने बैठक सुरुळीत झाली. बैठकीस जयदत्त होळकर, सोहनलाल भंडारी, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कºहे उपस्थित होते.