शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यंदा दोनच गावांचे टॅँकरचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:28 IST

सिन्नर : अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशाप्रकारे एकूण २९७ ठिकाणी ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

सिन्नर : (सचिन सांगळे) अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशाप्रकारे एकूण २९७ ठिकाणी ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू असल्याने नागरिक घरीच आहे.तालुक्याच्या सर्वच भागात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामीण भागात केटिवेअर, बंधारे, विहिरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे यावर्षी वाड्या-वस्त्यांमध्ये अद्याप पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे शासकीय कार्यालयांंमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा अशा परिस्थितीत तालुक्यात पाणीटंचाई नसल्याने पाणीपुरवठा विभाग निवांत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा सुरू होत असत. त्यामुळे प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती होती. तसेच पावसाचेही प्रमाण कमी होते. २४ मार्च रोजी सिन्नर तालुक्यात पहिला टॅँकर सुरु झाला होता. तब्बल १६ महिने ६५ टँकरद्वारे तालुक्यातील जनतेची तहान भागविली जात होती. अनेक गावांमध्ये शासनाचा टँकर आल्यानंतरच पिण्याचे पाणी येत होते. २६ जुलै २०१९ ला तालुक्यातील सर्व पाण्याचे टँकर बंद केले असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.यावर्षी तालुक्यातील सोनगिरी व सुळेवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाला होता. सोनगिरीला कोनांबे धरणातून तर सुळेवाडीला बारागाव पिंप्री योजनेतून पाणी उपलब्ध करून दिले आहे.दरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागातून टँकरची मागणी होत असते. त्या भागातही गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने अद्यापपर्यंत टँकरची मागणी आलेली नाही. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांत तालुक्यातील अनेक गावांत मुख्यमंत्री पेयजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याने पाणीटंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत.-----------------------------------सात पाणी योजनांचा आधार : सिन्नर तालुक्यात युती शासनाच्या काळात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आल्या. आजमितीला तालुक्यात सात नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याने हजारो ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. यामध्ये मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह ५ गावे, वावीसह ११ गावे, वडांगळीसह १३, ठाणगावसह ५, बारागाव पिंप्रीसह ७ व नायगावसह ९ गावे आदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. पाणीपुरवठा योजनांमुळे भरउन्हाळ्यातही नागरिकांना दिलासा मिळत आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने महिलांना पायपीट करावी लागली नाही.-----------------------भोजापूर धरणात९ टक्के साठासिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १५० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील पाचही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट साठा असून, त्यावर कणकोरीसह ५ गावे व मनेगावसह १६ गावे नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. तसेच उंबरदरी, बोरखिंड, कोनांबे, सरदवाडी, दातली, दुशिंगपूर, माळवाडी या मध्यम प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. गेल्यावर्षी धरणात चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिक