शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

जिल्ह्यात टॅँकरने गाठली पन्नाशी

By admin | Updated: February 17, 2016 00:43 IST

टंचाईची झळ : गतवर्षाच्या तुलनेत चारपट वाढ

नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, गत वर्षापेक्षा जवळपास चार पटीने यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने फेब्रुवारीच्या मध्यावर टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरने पन्नाशी गाठली. अपुरा पडलेला पाऊस व उन्हाचा वाढता तडाखा पाहता, यंदाचा उन्हाळा सर्वांचीच कसोटी पाहणारा ठरणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती पाहता यंदा जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे उभे ठाकणार आहे. गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने नदी, नाल्यांमधून पाहिजे त्या प्रमाणात पाणी वाहिले नाही तर विहिरींनाही पाणी उतरले नसल्याने जानेवारीपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी केली जात आहे. (पान ५ वर)नळ पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत आटल्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईची झळ सिन्नर तालुक्याला बसली असून, ६३ गावे, वाड्यांना १२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल येवला तालुक्यात २७ गावांना १३ टॅँकरने, तर नांदगाव तालुक्यातील ३९ गावांना ७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बागलाण तालुक्यातील १५ गावांसाठी १० टॅँकर सुरू आहेत. उन्हाचा तडाखा फेब्रुवारीच्या मध्यान्हातच वाढल्याने येणाऱ्या काळात त्याची तीव्रता आणखी वाढेल, परिणामी पाण्याच्या मागणीतही वाढ होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. जिल्'ातील धरणांमध्ये जेमतेम २२ टक्के पाणी असून, त्यातील काही धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत टॅँकरने पन्नाशी गाठल्यामुळे उन्हाळा अखेर हीच संख्या तीनशेच्या पुढे जाईल, अशी भीती शासकीय यंत्रणा व्यक्त करीत आहे.