शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

चौरंगी लढतीकडे तालुक्याचे लक्ष

By admin | Updated: February 10, 2017 23:11 IST

चुरस : प्रस्थापित राष्ट्रवादी कॉँग्रेसला शिवसेनेचे कडवे आव्हान

 दत्ता महाले  येवलाभाजपा-सेना काडीमोड आणि राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांच्यात झालेल्या बिघाडीमुळे येवला तालुक्याच्या राजापूर गटात चौरंगी लढत होत आहे. तालुक्यातील राजकारणात नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रस्थापित राष्ट्रवादीच्या सत्तेला पुन्हा शिवसेनेने आव्हान देण्याचा शंखनाद केला असून, आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. शिवसेनेचे सध्याचे दोन मात्तबर नेते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि संभाजीराजे पवार यांना आगामी विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यामुळे स्वत:सह आपले समर्थक निवडून आणण्यासाठी त्यांची मेहनत चालू आहे. राजापूर गट, नगरसूल गट गणासह अन्यत्र आपले समर्थक कसे निवडून येतील, याचा प्रयत्न करीत आहेत.नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वकियांकडून ग्रहण लागल्याची सल अ‍ॅड. माणिकराव शिंदे, यांच्या मनाला चाटून गेली. अंदरसूल गटातून शाहुराजे शिंदे यांची राष्ट्रवादीची उमेदवारी कापली गेली. त्यामुळे शिंदे हे राष्ट्रवादीची कितपत पाठराखण करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या सुरेखा दराडे यांना त्यांच्या राजगडात राष्ट्रवादीने जलतज्ज्ञ भागवत सोनवणे यांच्या पत्नी शकुंतला सोनवणे यांना उमेदवारी देऊन आव्हान दिले आहे, तर सेना-भाजपाची काडीमोड झाल्याने माजी आमदार, भाजपाचे कल्याणराव पाटील, आनंद शिंदे, शहराध्यक्ष राजुसिंग परदेशी यांनी अच्छे दिन ‘कॅश’ करण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते आरती गणेश ढाकणे यांना संधी देऊन दराडे यांना रोखण्याच्या खेळीचे एक पाऊल उचलले. सध्या या राजापूर गटात सोशल मीडियावर प्रचाराचे युद्ध चालू आहे. प्रत्यक्ष गाठीभेठी घेण्याचे सत्र सुरु आहे. आगामी काळात या गटात चांगलीच चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राजकीयदृष्ट्या हा गट लक्षवेधी बनला आहे. गेल्या निवडणुकीत आमदार छगन भुजबळ, शिंदे दराडे, बनकर व पवार एकत्रित होते. त्यामुळे सगळीकडे राष्ट्रवादीचा बोलबाला होता. परंतु आता दराडे-पवार सेनेत आहेत. राष्ट्रवादीला कडवे आव्हान दिले आहे. राजापूर गट ओबीसी महिला राखीव झाला. माजी आमदार स्व.जनार्दन पाटील यांचे नगरसुलसह राजापूर गटात त्यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले होते.त्यांच्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक किशोर दराडे बंधूंनी यांनी या गटावर विकासकामांचा सपाटा लावला आणि वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. परंतु माजी आमदार मारोतराव पवार व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचेही समर्थक या गटात आहेत. या गटाचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठेभोवती फिरण्याचा इतिहास आहे.या भागातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा असून, ममदापूर येथील मेळाचा बंधारा हा चाळीस वर्षे झाली तसा निवडणुकीचा मुद्दा आहे. गेल्या वर्षी आमदार छगन भुजबळ यांनी साडेसहा कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु सदर बंधारा हा वनविभागाच्या हद्दीत असल्याने जमीन हस्तांतरण बाकी असल्याने निधी पडून आहे. तसेच देवदरी येथील देवनाचा प्रकल्प हा अपूर्ण आहे. राजापूर येथे रुग्णालय तसेच या भागात प्रत्येक गावाना जोडणारे रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह मोठ्या प्रमाणावर कामे केली आहे, ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे.