शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

तळीरामांनी वळविला खेड्यांकडे मोर्चा

By admin | Updated: May 8, 2017 01:00 IST

तळवाडे दिगर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बिअर बारवर मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांनी मोर्चा आता खेड्यांकडे वळवला आहे

!लोकमत न्यूज नेटवर्कतळवाडे दिगर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तसेच शहरातील बिअर बारवर मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांनी आपला मोर्चा आता खेड्यांकडे वळवला आहे. तळवाड्यात गावठी दारूसोबतच देशी-विदेशीचे सर्वच ब्रँड सर्रासपणे विकले जात असल्याची चर्चा सुरू असल्याने आजूबाजूच्या खेड्यावरून येणाऱ्या ‘मद्यपी पाहुण्यां’ची वर्दळ वाढल्याने गावकऱ्यांकडून मद्यविक्री थांबविण्याची मागणी केली जात आहे.मागील काही वर्षांपासून थंड पेयच्या नावाखाली ‘सर्व’च पेय काही टपऱ्यांवर अवैधरीत्या सर्रासपणे विकले जात आहेत. विशेष बाब म्हणजे मद्यपींची संख्याही दिवसेंदिवस वाढतच गेली असून, वयस्करांपेक्षा तरुण व अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. सदर बाब भावी पिढीसाठी अत्यंत गंभीर असून, आई-वडिलांना चिंतन करावयास लावणारी आहे. सध्या सुट्यांचे दिवस असल्याने वारकरी संप्रदायामार्फत गावातील तसेच परिसरातील बालगोपाळांसाठी व्यसनमुक्ती प्रचारक कृष्णा रौंदळ यांच्या मार्गदर्शनाने बालसंस्कार केंद्र चालवले जात असून, शेजारीच असलेल्या ग्रामपंचायतीच्या आवारात काही मद्यपी दारूच्या बैठकीसाठी अंधाराची वाट पाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मद्यविक्रीच्या बाबतीत महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष धुसफुसत असून, असंतोषाची ठिणगी पडण्याआधीच ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने अवैध दारूविक्र ी तत्काळ बंद पाडावी व गाव व्यसनमुक्त करावे, असे ज्येष्ठ नागरिकांकडून बोलले जात आहे.