शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

विमानसेवेचे १५ डिसेंबरपासून टेकआॅफ शासनाचे आश्वासन : हेमंत गोडसे यांचे दिल्लीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:11 IST

नाशिकसह राज्यातील विमानसेवांसाठी मुंबई विमानतळावर वेळेच्या आरक्षणाची (टाइम स्लॉटची) उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात गुरुवारी (दि. २६) मोर्चा काढला.

नाशिक : नाशिकसह राज्यातील विमानसेवांसाठी मुंबई विमानतळावर वेळेच्या आरक्षणाची (टाइम स्लॉटची) उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात गुरुवारी (दि. २६) मोर्चा काढला. सदर मोर्चा खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकार आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेत टाइम स्लॉटला मान्यता देत १५ डिसेंबरच्या आत विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र नागरी उड्डाण मंत्रालयाने शिष्टमंडळाला दिले. केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने वर्षभरापूर्वी उडान योजनेची घोषणा केली. छोट-छोटी विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडणे हा हेतू या योजनेमागे आहे. या योजनेंतर्गत नाशिकसह राज्यातील पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आदी शहरे मुंबई विमानतळाशी जोडली जाणार आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी सतत पाठपुरावा करूनही जी.व्ही.के. कंपनीने राज्यातील विमानतळांना मुंबईत टाइम स्लॉट नसल्याचे स्पष्ट करत सुरू होणाºया विमानसेवेला खीळ घातली. मात्र गुजरातमधील कांडला, सुरत, पोरबंदर येथील विमानतळांना आॅगस्ट महिन्यात टाइम स्लॉट उपलब्ध करून दिला. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी थेट दिल्ली येथील नागरी वाहतूक मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चा मंत्रालयावर येताच आंदोलकांनी केंद्र सरकार आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यपद्धतीचा निषेध केला. मोर्चात खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष निरज शेठी, उत्तर भारतीय संघाचे विनय शुक्ला, सेनेचे पंजाब प्रदेशाध्यक्ष योगीराज शर्मा, बिहारचे कोशलेंद्र शर्मा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.नागरी वाहतूक मंत्रालयाकडून वेळेची मान्यताआंदोलनानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्या शिष्टमंडळाने नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी शासन आणि जी.व्ही.के. कंपनीकडून राज्याच्या विमानसेवेवर झालेल्या अन्यायाबाबत हेमंत गोडसे यांनी अधिकाºयांना माहिती दिली. आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन टाइम स्लॉटला मान्यता देत काहीही झाले तरी १५ डिसेंबरच्या आत नाशिकची विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र अधिकाºयांनी दिले. यावेळी नागरी वाहतूक मंत्रालयाचे उषा पाधी, रु बीना अलीम, जी. के. चोखीयाल, उमेश भारद्वाज, अनुप पंथ आदी अधिकारी उपस्थित होते. नागरी वाहतूक मंत्रालयाने लेखी हमीपत्र दिल्यावर आनंदलेल्या शिवसैनिकांनी मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा केला.