शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

फटाक्यांना दूर ठेवत विवेकाचे भान बाळगू : महेंद्र दातरंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:31 IST

फटाक्यांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय परिणाम पाहता भावीपिढीने फटाक्यांपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करावा

ठळक मुद्देफटाक्यांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय परिणाम पाहता भावीपिढीने फटाक्यांपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करावा फटाके ही आपली संस्कृती नाही. ती चीनकडून आलेली आहे.

नाशिक : पंजाब येथे रावणदहन आणि त्यानंतर होणारी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यात दंग असलेल्या प्रेक्षकांचा रेल्वेने घेतलेला बळी आणि एकूणच फटाक्यांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय परिणाम पाहता भावीपिढीने फटाक्यांपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते महेंद्र दातरंगे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता याविषयासह इतर अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकतानाच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही केले. त्यांच्याशी साधलेला हा संवादप्रश्न : फटाकेमुक्त अभियान अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवित आहे. तो काय कार्यक्रम आहे?उत्तर : गेल्या १८ वर्षांपासून महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती फटाकेमुक्त दिवाळी हे अभियान शाळा, महाविद्यालये व इतर अनेक ठिकाणी राबवित आहे. यात पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट आदींद्वारे फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. विद्यार्थ्यांना फटाके वाजवूच नका, असे सांगितले तर ते ऐकणार नाही पण त्यांना फटाक्यांचे प्रमाण कमी कमी करत जा, सुरसुऱ्या, कमी आवाजाचे फटाके फोडा असे सांगितले जाते. त्यातून त्यांची जाणीव वाढत जात आहे. फटाक्यांचे पैसे वाचवून त्यात इतर अनेक चांगल्या गोष्टी करता येतील, हे सांगितले जात आहे. मुलांना ते पटत आहे.प्रश्न : फटाक्यांमुळे काय आणि कसे परिणाम होतात?उत्तर : फटाके ही आपली संस्कृती नाही. ती चीनकडून आलेली आहे. आपली संस्कृती ही दिवे लावून, दीपोत्सव साजरा करण्याची आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती धर्मचिकित्सा करू इच्छिते. जे कालबाह्य झाले आहे ते काढून टाकले पाहिजे, असा आग्रह धरला जातो. फटाक्यांच्या बाबतीतही हे लागू होते. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे लहान मुले, वयोवृद्ध, आजारी लोक यांना त्रास होतो. वायूप्रदूषण तीव्र होते. दिवाळीच्या काळात या फटाक्यांमुळे बºयाच लोकांना अस्थमाचा त्रास होतो. त्यांच्या श्वसनाला अडथळा निर्माण होतो. लोक आजारी पडतात. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवाळीत लाखो-करोडो रुपयांचे फटाके विकत घेऊन फोडतो. म्हणजे आपण लाखो-करोडो रुपये जाळतो. पैशांचा धूर करतो. या गोष्टीही लक्षात घेतल्या पाहिजे.प्रश्न : फटाके बनविणाºयांच्या आरोग्यावरही परिणाम होतो, त्याबद्दल काय सांगाल?उत्तर : उत्तर प्रदेश, तामिळनाडू अशा अनेक भागात फटाके तयार होतात. महाराष्टÑातही काही ठिकाणी फटाके तयार केले जातात. फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून, स्फोट होऊन मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाणही मोठे आहे. दरवर्षी या घटना घडतात. या व्यवसायात बालकामगारांचा भरणा अधिक असतो. बालकामगार स्वस्तात मिळतात म्हणून त्यांना राबवून घेतले जाते. या प्रकाराने त्यांचे बालपण आपण जाळत असतो. फटाके बनवणाºयांना कॅन्सर, अस्थमा, श्वसनाचे विकार, त्वचारोग असे अनेक आजार होतात. गर्भवती महिलांच्या बाळांवर परिणाम होतो. हे सारे पाहिल्यानंतर आपल्याला फटाक्यांचा इतका सोस का असावा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.प्रश्न : यंदाच्या दिवाळीत या विषयाची जनजागृती कशी करणार आहात?उत्तर : गेल्या १८ वर्षांपासून अंनिस फटाकेमुक्त दिवाळीसाठी जनजागृतीचे काम करतेच आहे. यंदा दिवाळी साजरी करताना ‘फटाक्यांना दूर ठेवत विवेकाचे भान बाळगुया’ या संदेशावर भर दिला जाणार आहे. फटाके न खरेदी केल्यामुळे वाचलेल्या पैशात पुस्तके, खेळणी आणि इतर अनेक गोष्टी घेता येतील, हे मुलांना पटवून दिले जाणार आहे. फटाक्यांचे वाचलेले पैसे आदिवासी पाड्यांवर जाऊन, त्यांना भेटवस्तू देऊन वेगळा आनंद मिळवू शकतो हे मुलांना आणि पालकांना सांगत आहोत. प्रदूषणमुक्त दिवाळी, आरोग्यदायी दिवाळी हा संदेश सर्वांच्या मनावर ठसविला जाणार आहे.