शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

तहसीलदार, बीडीओंना निलंबित करण्याची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:15 IST

नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक चुकीची माहिती दिल्यास कारवाई

नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत टळून गेल्यावरही त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी अचूक माहिती न दिल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या मुदतीत निवडणुका घेता आल्या नाहीत, त्याबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन नाशिक जिल्ह्णाच्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्यामुळे भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गटविकास अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी सर्वांनाच धारेवर धरत ग्रामपंचायतींची माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची अशी विचारणा केली. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जी पहिली बैठक ग्रामपंचायतीची होईल त्या तारखेपासून ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी धरला जात असताना त्याबाबतची माहिती गटविकास अधिकाºयास असणे क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी गटविकास अधिकाºयांना धारेवर धरताना ग्रामपंचायत सदस्यांबाबत चुकीची माहिती प्रशासनाला दिली जात असल्याचा ठपका ठेवला. एकीकडे संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला जात असताना ग्रामपंचायत सदस्य वा सरपंचाकडे शौचालय नसल्याचे अपिले कशी काय दाखल केली जातात, असा सवाल त्यांनी विचारला व याबाबत गावपातळीवरूनच दिशाभूल व चुकीची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींच्या जागेवर अतिक्रमणाची बाबही अशाच प्रकारची असून, सदस्यांकडून अतिक्रमण केले जात असताना ग्रामसेवक कधी अतिक्रमण झाले नाही, असा अहवाल देतो व कधी अतिक्रमण केले आहे, अशी दुहेरी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याने त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांची असल्याचे सांगितले.सरपंचाची निवडणूक तहसील कार्यालयामार्फत पार पाडली जात असल्यामुळे त्यांनीही याबाबत जागरूक राहणे गरजेचे असून, यापुढे ग्रामपंचायतीची माहिती पाठविण्याची संयुक्त जबाबदारी गटविकास अधिकारी व तहसीलदारांची असून, त्यात कुचराई केल्यास थेट निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला

टॅग्स :Governmentसरकार