शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

चौदा ग्रामपंचायतींचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: April 7, 2017 01:25 IST

नाशिक : चणकापूर, पूनद, अर्जुनसागर यांसारख्या पाण्याने भरलेली धरणे, तलावांच्या कळवण तालुक्यातील चौदा गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

 नाशिक : चणकापूर, पूनद, अर्जुनसागर यांसारख्या पाण्याने भरलेली धरणे, तलावांच्या कळवण तालुक्यातील चौदा गावांना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, धरणांमध्ये पाणी असूनही पाटबंधारे खाते व जिल्हाधिकारी पाणी देण्यास नकार देत असल्याने ग्रामस्थांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. सध्या पूनद धरणात ९० टक्के इतके पाणी शिल्लक असून, ते पूनद नदीपात्रात तसेच सुळे डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून सोडल्यास चौदा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी पाटबंधारे खात्याने धरणाच्या मोरीत लाकडे अडकल्याचे निमित्त करून धरणातील पाणी पूर्णपणे संशयास्पदरीत्या सोडून दिले होते. आता मात्र गावकऱ्यांकडून मागणी होत असताना पाणी दिले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून या चौदा ग्रामपंचायतींचे सरपंच व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत असूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी कळवण पंचायत समितीचे सदस्य केदा ठाकरे, कौतिक गांगुर्डे, संजय शेवाळे, मनोहर शेवाळे, केदा बहिरम, संदीप वाघ, प्रल्हाद जाधव, भरत अहेर, राजेंद्र भामरे आदिंनी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.