शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रतीकात्मक सिग्नल’ आंदोलन

By admin | Updated: March 27, 2017 00:27 IST

नाशिक : गत आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

नाशिक : गत आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी (दि़२६) सायंकाळी जेहान सर्कल येथे त्वरित सिग्नल यंत्रणा बसवावी या मागणीसाठी लेवा सखी मंचच्या महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नागरिकांनी प्रतीकात्मक सिग्नल तयार करून अभिनव आंदोलन केले़ गंगापूररोडवरील जेहान सर्कल, शहीद चौक, सप्तरंग हॉटेल या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होतात़ या अपघातांना आळा घालण्यासाठी याठिकाणी सिग्नल बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ गत आठवडाभरात नीलिमा चौधरी व प्रा़ रूपाली पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला़ यामुळे परिसरातील महिला व नागरिकांनी रविवारी सायंकाळी जेहान सर्कलवर एकत्र आले़ यातील महिलांच्या हातामध्ये वाहतूक नियमांचे पालन करा, वेगमर्यादा पाळा या जनजागृतीपर घोषणांचे फलक होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, किशोर सिरसाठ यांनी प्रतीकात्मक सिग्नल तयार करून त्याद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, आमदार सीमा हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी आंदोलनकर्ते नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या़ (प्रतिनिधी)महिलांनी जेहान सर्कल ते शहीद चौकापर्यंत मेणबत्ती पेटवून मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहिली़ या आंदोलनात लेवा सखी मंडळाच्या माधुरी चौधरी, भारती चौधरी, स्वाती पाचपांडे, अनिता झांबरे, अनिश चौधरी, राहुल वायकोळे यांसह मृत्यूमुखी पडलेल्या महिलांचे नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ दरम्यान, या ठिकाणी सिग्नल व गतिरोधक न टाकल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़ पोलीस आयुक्तांकडे तक्रारजेहान सर्कलवरील महिलांच्या आंदोलनाची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल हे आंदोलनस्थळी पोहोचले होते़ यावेळी महिलांनी गंगापूर रोड हा केवळ आकाराने मोठा करण्यात आला़ त्यावर कुठेही गतिरोधक बसविलेला नाही़ तसेच रस्त्यावरील अतिक्रमण, वेगमर्यादा याचे फलक लावले नसल्याची तक्रार केली़ यावर पोलीस आयुक्तांनी वाहतूक सुरक्षा व खबरदारी प्रत्येक शहरवासीयांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले़