शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

‘प्रतीकात्मक सिग्नल’ आंदोलन

By admin | Updated: March 27, 2017 00:27 IST

नाशिक : गत आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

नाशिक : गत आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी (दि़२६) सायंकाळी जेहान सर्कल येथे त्वरित सिग्नल यंत्रणा बसवावी या मागणीसाठी लेवा सखी मंचच्या महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नागरिकांनी प्रतीकात्मक सिग्नल तयार करून अभिनव आंदोलन केले़ गंगापूररोडवरील जेहान सर्कल, शहीद चौक, सप्तरंग हॉटेल या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होतात़ या अपघातांना आळा घालण्यासाठी याठिकाणी सिग्नल बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ गत आठवडाभरात नीलिमा चौधरी व प्रा़ रूपाली पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला़ यामुळे परिसरातील महिला व नागरिकांनी रविवारी सायंकाळी जेहान सर्कलवर एकत्र आले़ यातील महिलांच्या हातामध्ये वाहतूक नियमांचे पालन करा, वेगमर्यादा पाळा या जनजागृतीपर घोषणांचे फलक होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, किशोर सिरसाठ यांनी प्रतीकात्मक सिग्नल तयार करून त्याद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, आमदार सीमा हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी आंदोलनकर्ते नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या़ (प्रतिनिधी)महिलांनी जेहान सर्कल ते शहीद चौकापर्यंत मेणबत्ती पेटवून मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहिली़ या आंदोलनात लेवा सखी मंडळाच्या माधुरी चौधरी, भारती चौधरी, स्वाती पाचपांडे, अनिता झांबरे, अनिश चौधरी, राहुल वायकोळे यांसह मृत्यूमुखी पडलेल्या महिलांचे नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ दरम्यान, या ठिकाणी सिग्नल व गतिरोधक न टाकल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़ पोलीस आयुक्तांकडे तक्रारजेहान सर्कलवरील महिलांच्या आंदोलनाची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल हे आंदोलनस्थळी पोहोचले होते़ यावेळी महिलांनी गंगापूर रोड हा केवळ आकाराने मोठा करण्यात आला़ त्यावर कुठेही गतिरोधक बसविलेला नाही़ तसेच रस्त्यावरील अतिक्रमण, वेगमर्यादा याचे फलक लावले नसल्याची तक्रार केली़ यावर पोलीस आयुक्तांनी वाहतूक सुरक्षा व खबरदारी प्रत्येक शहरवासीयांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले़