शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश स्वामी स्वरूपानंद : शंकराचार्य न्यासतर्फे व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:22 IST

माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वेदान्ताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वेदान्ताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपीठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि. ७) सरस्वती यांनी गुंफले. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून, दुसरे पुष्प गुंफताना सरस्वती म्हणाले, माणसाच्या बुद्धीचा नाश हा केवळ त्याच्या काम व क्रोधामुळे होतो. स्वत:च्या अध:पतनाला तो स्वत: जबाबदार असतो.जितक्या तीव्रतेने राग, द्वेष उफाळून बाहेर येतात तितक्याच तीव्रतेने भोगवासना निर्माण होत जाते आणि माणूस अधर्मी होऊन क्रूरकर्म करण्यास प्रवृत्त होतो. माणसाकडे विचार करण्याची शक्ती आहे तरी माणूस क्रूर व एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा का वर्तणूक करतो? विविध पदव्या घेऊन माणूस सुधारत नसतो. पदव्याने माणसाच्या बहिरंगाचा विकास होत असला तरी अंतरंगाचा विकास अपूर्ण राहतो हे लक्षात घेतले पाहिजे. माणसातील काम, क्रोध, द्वेष हे दोष जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत त्याला आत्मशांती लाभू शकत नाही आणि तो ‘माणूस’ म्हणून जगूही शकत नाही. उपभोग घेण्याची लालसा निर्माण झाली तर मन थांबत नाही. मनावर नियंत्रण मिळविणे माणसाला अवघड होत जाते. मनावर नियंत्रण व ताबा ठेवण्यासाठी काम, क्रोध, राग, द्वेष यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सात दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (दि. १२) होणार आहे.