शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश स्वामी स्वरूपानंद : शंकराचार्य न्यासतर्फे व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:22 IST

माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वेदान्ताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वेदान्ताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपीठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि. ७) सरस्वती यांनी गुंफले. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून, दुसरे पुष्प गुंफताना सरस्वती म्हणाले, माणसाच्या बुद्धीचा नाश हा केवळ त्याच्या काम व क्रोधामुळे होतो. स्वत:च्या अध:पतनाला तो स्वत: जबाबदार असतो.जितक्या तीव्रतेने राग, द्वेष उफाळून बाहेर येतात तितक्याच तीव्रतेने भोगवासना निर्माण होत जाते आणि माणूस अधर्मी होऊन क्रूरकर्म करण्यास प्रवृत्त होतो. माणसाकडे विचार करण्याची शक्ती आहे तरी माणूस क्रूर व एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा का वर्तणूक करतो? विविध पदव्या घेऊन माणूस सुधारत नसतो. पदव्याने माणसाच्या बहिरंगाचा विकास होत असला तरी अंतरंगाचा विकास अपूर्ण राहतो हे लक्षात घेतले पाहिजे. माणसातील काम, क्रोध, द्वेष हे दोष जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत त्याला आत्मशांती लाभू शकत नाही आणि तो ‘माणूस’ म्हणून जगूही शकत नाही. उपभोग घेण्याची लालसा निर्माण झाली तर मन थांबत नाही. मनावर नियंत्रण मिळविणे माणसाला अवघड होत जाते. मनावर नियंत्रण व ताबा ठेवण्यासाठी काम, क्रोध, राग, द्वेष यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सात दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (दि. १२) होणार आहे.