शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश स्वामी स्वरूपानंद : शंकराचार्य न्यासतर्फे व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:22 IST

माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वेदान्ताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : माणसाच्या मनाचे संतुलन बिघडविणारे खरे शत्रू काम, क्रोध, द्वेष आहेत. आत्मशांतीचा शोध बाहेर वातावरणात घेऊन उपयोग नाही तर तो माणसाने स्वत:च्या अंतरमनातच घ्यायला हवा; मात्र संतप्त मन असेल तर शांती मिळूच शकत नाही. राग, द्वेषामुळे मन संतप्त होत जाते हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन वेदान्ताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपीठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि. ७) सरस्वती यांनी गुंफले. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून, दुसरे पुष्प गुंफताना सरस्वती म्हणाले, माणसाच्या बुद्धीचा नाश हा केवळ त्याच्या काम व क्रोधामुळे होतो. स्वत:च्या अध:पतनाला तो स्वत: जबाबदार असतो.जितक्या तीव्रतेने राग, द्वेष उफाळून बाहेर येतात तितक्याच तीव्रतेने भोगवासना निर्माण होत जाते आणि माणूस अधर्मी होऊन क्रूरकर्म करण्यास प्रवृत्त होतो. माणसाकडे विचार करण्याची शक्ती आहे तरी माणूस क्रूर व एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा का वर्तणूक करतो? विविध पदव्या घेऊन माणूस सुधारत नसतो. पदव्याने माणसाच्या बहिरंगाचा विकास होत असला तरी अंतरंगाचा विकास अपूर्ण राहतो हे लक्षात घेतले पाहिजे. माणसातील काम, क्रोध, द्वेष हे दोष जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत त्याला आत्मशांती लाभू शकत नाही आणि तो ‘माणूस’ म्हणून जगूही शकत नाही. उपभोग घेण्याची लालसा निर्माण झाली तर मन थांबत नाही. मनावर नियंत्रण मिळविणे माणसाला अवघड होत जाते. मनावर नियंत्रण व ताबा ठेवण्यासाठी काम, क्रोध, राग, द्वेष यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सात दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (दि. १२) होणार आहे.