शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करायाचा स्वामी स्वरूपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:50 IST

विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करावयाचा आहे. मानवाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार आणता कामा नये, कारण जीवनात यशस्वी होत असताना, यशोशिखरे सर करताना प्रतिबंध येत असतात. या प्रतिबंधांवर व अडथळ्यांवर सकारात्मक विवेकशक्तीने मात करावी, असे प्रतिपादन वेदांताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्देसुश्राव्य व्याख्यानमालेचे चौथे पुष्पमनाच्या संकल्पावर मानवाची क्रिया रविवारी या व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करावयाचा आहे. मानवाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार आणता कामा नये, कारण जीवनात यशस्वी होत असताना, यशोशिखरे सर करताना प्रतिबंध येत असतात. या प्रतिबंधांवर व अडथळ्यांवर सकारात्मक विवेकशक्तीने मात करावी, असे प्रतिपादन वेदांताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपीठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कूर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुरुवारी (दि. ९) सरस्वती यांनी गुंफले. ‘मनोनिग्रह’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, या जगात कोणाचेही जीवन सुलभ व सुखी नाही, हे लक्षात घ्यावे. मनाच्या संकल्पावर मानवाची क्रिया अवलंबून असते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे संकल्प शुद्ध असला तर क्रियाही शुद्ध स्वरूपाचीच घडते. मनाचा वापर चांगल्याप्रकारे केल्यास त्याचे परिणामही चांगले दिसतात. मानवाला सर्वाधिक त्रास हा त्याच्या मनापासून होत असतो. मात्र मानव त्याच्या वेदनांवरील उपाय अंतर्मुख होऊन शोधत नाही तर बहिर्मुख होऊन शोधत फिरतो अन् तो येथेच चुकतो, हे समजून घेण्याची गरज असल्याचे सरस्वती म्हणाले. येत्या रविवारी या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.