शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

साधनेतून मिळते चिरकाल प्रतिभा

By admin | Updated: September 26, 2016 02:06 IST

प्रकाश पाठक : प्रतिभा संगम संमेलनाचा समारोप

नाशिक : कलाक्षेत्रासह अन्य क्षेत्रांतही अतिशिघ्रतेने प्राप्त होणारी प्रतिभा अहंकार नावाच्या विषयाला जोडली जाण्याची भीती असते. त्यामुळे कलेच्या प्रांतात उंची गाठण्यासाठी अभ्यास, वाचन, व्यासंग, साधनेची व एकाग्रतेची गरज असून, या मार्गाने प्राप्त केलेली प्रतिभा चिरकाल टिकते, असे प्र्रतिपादन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.रावसाहेब सभागृहात उभारण्यात आलेल्या महाकवी वामनदादा कर्डकनगरीत महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभासंगम संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निसर्गकवी नीलेश पाटील व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासह अभाविपचे शहराध्यक्ष डॉ. प्रशांत टोपे, प्रदेशमंत्री राम सातपुते, प्रमोद कऱ्हाड, अमोल अहिरे आदि उपस्थित होते. पाठक म्हणाले, प्रसंगावधनता आणि त्या प्रसंगाच्या गांभीर्यातून उत्स्फूर्तपणे सुचणारे काव्य, कथा आदि विविध साहित्यप्रकार हे चिरकाळ टिकतात. कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या गहन कविता लिहिल्या. त्या आजही चिरतरुण वाटतात. कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे ओजस्वी क्र ांतिकवी उभा राहतो आणि ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असा गगनभेदी जयघोष कानी ऐकू येतो. त्यांनी १९६२च्या युद्धकाळात रचलेले हे गीत उत्स्फू र्त साहित्यरचनेचे उदाहरण असल्याचे मत पाठक यांनी व्यक्त केले. तसेच काश्मीर येथील उरी खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही प्रतिक्रिया उमटण्यासाठी उत्स्फूर्त रचना गरजेची असल्याचे ते म्हणाले. वर्णन आणि अनुभव हे दोन वेगळे विषय असून, अनुभवातून रचनेत आत्मियता येते, तर वर्णनात शब्दांची झालर आल्याने त्यात आत्मियता नसल्याचे स्पष्ट जाणवते. अनुभवातून प्राप्त शक्तीच्या आधारे असामाजिकतेवर प्रहार करण्याचे बळ प्राप्त होत असल्याचे पाठक यांनी सांगितले. प्रास्ताविक राम सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत टोपे यांनी केले. अमोल अहिर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)