शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची संततधार

By admin | Updated: August 2, 2016 02:27 IST

पाणी सोडले : जिल्ह्यात पुराचा धोका; नदीकाठी सावधानतेचा इशारा

नाशिक : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही आपली हजेरी कायम ठेवल्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, गंगापूर, दारणा व पालखेड या तिन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

सोमवारी दिवसभर पावसाने कमी, अधिक प्रमाणात आपली हजेरी कायम ठेवली. सकाळी ८ वाजेनंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी १ वाजेनंतर पुन्हा संततधार लावली. त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. विशेष करून सायंकाळी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांतून घरी परतणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांची धांदल उडाली, त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. या पावसामुळे रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे गंगापूर धरण क्षेत्रात तसेच धरणाच्या खालच्या बाजूलाही पाऊस कायम असल्याने गोदावरी नदीची पूरपरिस्थिती कायम राहिली, परंतु दिवसभर पावसाची हजेरी लक्षात घेता सायंकाळी पाच वाजता गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. रविवारपासून सुरू असलेल्या २,४६० क्यूसेक पाण्यात एक हजाराने म्हणजेच ३,६४७ इतकी वाढ करण्यात आली, तर दारणा धरणातून ११,६८८ व पालखेडमधून कादवा नदीत ३५० क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरण, नदी, नाल्यांच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नदीकाठच्या गावांना पुरामुळे बाधा पोहोचू शकते, त्यादृष्टीने सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारीही केली जात आहे. ...इन्फो...रविवारी (दि.३१) दुपारपासून गंगापूर धरणातून २७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणात सोमवार दुपारपर्यंत एकूण १७३. ४७ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सातत्याने सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणाचीही पातळी वाढली असून, सोमवारपर्यंत गंगापूर धरणात ४५७५ (८१ टक्के) दलघफू पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.