शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार

By admin | Updated: July 30, 2016 01:38 IST

जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या अध्यादेशाला स्थगिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. जमिनी संपादित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, घाई करू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सिन्नर, इगतपुरी व कोपरगाव येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी शेतकऱ्यांसोबत बोलतांना पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपण यासंबंधी मागणी करणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, सिन्नरचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, शहाजी पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, रामदास जायभावे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुंबई येथे जावून आमदार आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली पवार यांनी भेट घेतली. या महामार्गाची रुंदी किती, किती जमिनी संपादित कराव्या लागतील याबाबतची माहिती शासनाने द्यायला हवी होती असे सांगितले. ज्यांच्या जमिनी यापूर्वी विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत पुन्हा पुन्हा त्यांच्या जमिनी संपादित करुन प्रश्न निर्माण करु नका असे पवार यावेळी म्हणाले. दहा वर्षापूर्वी या भागात असाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी संरक्षण विभाग व आम्ही बसून या प्रश्नावर मार्ग काढला होता असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित करण्यासाठी काढण्यात आलेला अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याच विषयावर बैठकीला जात निघालो असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडेही आपण हीच मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. जेथे प्रकल्प होत आहे तेथील प्रमुख लोकांना एकत्र बसवा, त्यांच्यासोबत चर्चा करा. उगाच त्यांना विश्वासात न घेता जमिनींचे ताबे घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर पवार हे मुख्यमंत्र्यासोबत बैठकीला निघून गेले. तत्पूर्वी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास आपला विरोध असल्याचे पवार यांना सांगितले. जमिनी संपादित केल्यास आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भितीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)