शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार

By admin | Updated: July 30, 2016 01:38 IST

जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या अध्यादेशाला स्थगिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. जमिनी संपादित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, घाई करू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सिन्नर, इगतपुरी व कोपरगाव येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी शेतकऱ्यांसोबत बोलतांना पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपण यासंबंधी मागणी करणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, सिन्नरचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, शहाजी पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, रामदास जायभावे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुंबई येथे जावून आमदार आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली पवार यांनी भेट घेतली. या महामार्गाची रुंदी किती, किती जमिनी संपादित कराव्या लागतील याबाबतची माहिती शासनाने द्यायला हवी होती असे सांगितले. ज्यांच्या जमिनी यापूर्वी विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत पुन्हा पुन्हा त्यांच्या जमिनी संपादित करुन प्रश्न निर्माण करु नका असे पवार यावेळी म्हणाले. दहा वर्षापूर्वी या भागात असाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी संरक्षण विभाग व आम्ही बसून या प्रश्नावर मार्ग काढला होता असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित करण्यासाठी काढण्यात आलेला अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याच विषयावर बैठकीला जात निघालो असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडेही आपण हीच मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. जेथे प्रकल्प होत आहे तेथील प्रमुख लोकांना एकत्र बसवा, त्यांच्यासोबत चर्चा करा. उगाच त्यांना विश्वासात न घेता जमिनींचे ताबे घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर पवार हे मुख्यमंत्र्यासोबत बैठकीला निघून गेले. तत्पूर्वी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास आपला विरोध असल्याचे पवार यांना सांगितले. जमिनी संपादित केल्यास आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भितीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)