शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

सेंद्रिय शेतीचे तंत्र आत्मसात करावे सूर्यकांता पाटील : राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:06 IST

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.

नाशिक : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.नाशिक द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे नांदूर नाका परिसरातील शेवंता लॉन्स येथे राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे यांच्यासह व्यासपीठावर आॅर्गेनिक सोसायटीचे चेअरमन कांजीभाई कलावाडीया, एन. डी. पाटील, अश्विनी न्याहारकर, सुप्रिया सोनवणे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, पूर्वीपासून शेतीची धुरा महिलांनी सांभाळली आहे. मात्र शेतात बैलांची जागा जरी ट्रॅक्टरने घेतली असली तरी शेतकरी महिला बदललेली नाही. या महिलांनी शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी समाजात स्त्री शिक्षणाचा प्रचार व प्रसार आणखी व्यापक पद्धतीने होणे गरजेचे आहे. पारंपरिक शेती करण्यासाठी आजची नवीन पिढी तयार होत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून शेती आणि मातीच्या विकासासाठी सेंद्रिय शेतीच्या दिशेने जाणे काळाची गरज बनली असून, स्त्री शिक्षणामुळे हे आव्हान पेलने शक्य होईल. महिलांनी ज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली असून, ज्या महिलांनी शिक्षणाच्या आधारे शेतीत प्रवेश केला त्यांनी शेतीचे रूप पालटले असून, अशा महिलांचा यशोचित सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळून शेतीतील मेलेल्या मातीला पुनरुज्जीवन मिळेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. वसंत ढिकले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. चंद्रकांत बनकर यांनी आभार मानले.