शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

सेंद्रिय शेतीचे तंत्र आत्मसात करावे सूर्यकांता पाटील : राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:06 IST

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.

नाशिक : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.नाशिक द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे नांदूर नाका परिसरातील शेवंता लॉन्स येथे राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे यांच्यासह व्यासपीठावर आॅर्गेनिक सोसायटीचे चेअरमन कांजीभाई कलावाडीया, एन. डी. पाटील, अश्विनी न्याहारकर, सुप्रिया सोनवणे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, पूर्वीपासून शेतीची धुरा महिलांनी सांभाळली आहे. मात्र शेतात बैलांची जागा जरी ट्रॅक्टरने घेतली असली तरी शेतकरी महिला बदललेली नाही. या महिलांनी शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी समाजात स्त्री शिक्षणाचा प्रचार व प्रसार आणखी व्यापक पद्धतीने होणे गरजेचे आहे. पारंपरिक शेती करण्यासाठी आजची नवीन पिढी तयार होत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून शेती आणि मातीच्या विकासासाठी सेंद्रिय शेतीच्या दिशेने जाणे काळाची गरज बनली असून, स्त्री शिक्षणामुळे हे आव्हान पेलने शक्य होईल. महिलांनी ज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली असून, ज्या महिलांनी शिक्षणाच्या आधारे शेतीत प्रवेश केला त्यांनी शेतीचे रूप पालटले असून, अशा महिलांचा यशोचित सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळून शेतीतील मेलेल्या मातीला पुनरुज्जीवन मिळेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. वसंत ढिकले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. चंद्रकांत बनकर यांनी आभार मानले.