शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

सेंद्रिय शेतीचे तंत्र आत्मसात करावे सूर्यकांता पाटील : राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:06 IST

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.

नाशिक : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.नाशिक द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे नांदूर नाका परिसरातील शेवंता लॉन्स येथे राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे यांच्यासह व्यासपीठावर आॅर्गेनिक सोसायटीचे चेअरमन कांजीभाई कलावाडीया, एन. डी. पाटील, अश्विनी न्याहारकर, सुप्रिया सोनवणे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, पूर्वीपासून शेतीची धुरा महिलांनी सांभाळली आहे. मात्र शेतात बैलांची जागा जरी ट्रॅक्टरने घेतली असली तरी शेतकरी महिला बदललेली नाही. या महिलांनी शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी समाजात स्त्री शिक्षणाचा प्रचार व प्रसार आणखी व्यापक पद्धतीने होणे गरजेचे आहे. पारंपरिक शेती करण्यासाठी आजची नवीन पिढी तयार होत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून शेती आणि मातीच्या विकासासाठी सेंद्रिय शेतीच्या दिशेने जाणे काळाची गरज बनली असून, स्त्री शिक्षणामुळे हे आव्हान पेलने शक्य होईल. महिलांनी ज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली असून, ज्या महिलांनी शिक्षणाच्या आधारे शेतीत प्रवेश केला त्यांनी शेतीचे रूप पालटले असून, अशा महिलांचा यशोचित सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळून शेतीतील मेलेल्या मातीला पुनरुज्जीवन मिळेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. वसंत ढिकले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. चंद्रकांत बनकर यांनी आभार मानले.