शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जन्मदात्रीने सोडले़़़परिचारिकांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून गेली़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील डॉक्टर व परिचारिकांनी या मुलांचे पालकत्व घेऊन पन्नास दिवस सांभाळत त्यांना जीवदान दिले असून, त्या मातेचा शोध घेत बुधवारी तिच्याकडे बालके सुपूर्द करण्यात आली.

विजय मोरे ।नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून गेली़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील डॉक्टर व परिचारिकांनी या मुलांचे पालकत्व घेऊन पन्नास दिवस सांभाळत त्यांना जीवदान दिले असून, त्या मातेचा शोध घेत बुधवारी तिच्याकडे बालके सुपूर्द करण्यात आली.जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू (नवजात अर्भक कक्ष) विभाग अर्भक मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आला असताना या विभागातील कर्मचाºयांनी जुळ्यांना दिलेले जीवदान ही प्रशंसनीय बाब ठरली आहे़ त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील संगीता किसन धोंड या महिलेने पन्नास दिवसांपूर्वी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला़ अर्थात यासाठी डॉक्टरांना तिचे सिझर करावे लागले़ त्यात दुर्दैव म्हणजे जन्माला आलेल्या दोन मुलांपैकी एक मूल हे १ किलो ४०० ग्रॅम, तर दुसरे १ किलो ५०० ग्रॅम होते़ आईने मुलांची प्रकृती सुधारेल या आशेवर पाच दिवस रुग्णालयात काढले मात्र शेवटी आशा सोडून ती आपल्या स्वगृही परतली़जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉ़ डी़ पी़ गाजरे, डॉ़ के. पवार, डॉ़ बागुल, डॉ़ ठाकूर, डॉ़ ठोंबरे, परिचारिका व्ही़ वामोरकर, बी़ पाटील, कटाळे, गावित, नागमोडे, पाटील, शेवाळे, आऱ घुले, कासोटे, घोडेस्वार, शिंदे, शहा यांनी या मरणाच्या दारातील जुळ्या मुलांची ५० दिवस अहोरात्र काळजी घेऊन त्यांना जीवदान दिले़ विशेष म्हणजे मुलांना सोडून गेलेल्या या मातेचा शोध पोलिसांनी आपल्या पातळीवर खूप घेतला मात्र त्यांना अपयश आले़ अखेर पन्नास दिवसांनंतर या मातेचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले़पोलिसांनी या मातेला शोधून बुधवारी जिल्हा रुग्णालयात आणले़ या ठिकाणी आपली दोन्ही मुले जिवंत व गुटगुटीत असल्याचे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला़ मुलांना जीवनदान देणारे जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉक्टर, परिचारिका व पोलिसांचे आभार मानून तिच्या दोन्ही पिलांना कवेत घेऊन ती आपल्या घरी गेली़ या मातेला तिची मुले देताना परिचारिकांनाही भरूनआले होते़