शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

जन्मदात्रीने सोडले़़़परिचारिकांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून गेली़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील डॉक्टर व परिचारिकांनी या मुलांचे पालकत्व घेऊन पन्नास दिवस सांभाळत त्यांना जीवदान दिले असून, त्या मातेचा शोध घेत बुधवारी तिच्याकडे बालके सुपूर्द करण्यात आली.

विजय मोरे ।नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून गेली़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील डॉक्टर व परिचारिकांनी या मुलांचे पालकत्व घेऊन पन्नास दिवस सांभाळत त्यांना जीवदान दिले असून, त्या मातेचा शोध घेत बुधवारी तिच्याकडे बालके सुपूर्द करण्यात आली.जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू (नवजात अर्भक कक्ष) विभाग अर्भक मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आला असताना या विभागातील कर्मचाºयांनी जुळ्यांना दिलेले जीवदान ही प्रशंसनीय बाब ठरली आहे़ त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील संगीता किसन धोंड या महिलेने पन्नास दिवसांपूर्वी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला़ अर्थात यासाठी डॉक्टरांना तिचे सिझर करावे लागले़ त्यात दुर्दैव म्हणजे जन्माला आलेल्या दोन मुलांपैकी एक मूल हे १ किलो ४०० ग्रॅम, तर दुसरे १ किलो ५०० ग्रॅम होते़ आईने मुलांची प्रकृती सुधारेल या आशेवर पाच दिवस रुग्णालयात काढले मात्र शेवटी आशा सोडून ती आपल्या स्वगृही परतली़जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉ़ डी़ पी़ गाजरे, डॉ़ के. पवार, डॉ़ बागुल, डॉ़ ठाकूर, डॉ़ ठोंबरे, परिचारिका व्ही़ वामोरकर, बी़ पाटील, कटाळे, गावित, नागमोडे, पाटील, शेवाळे, आऱ घुले, कासोटे, घोडेस्वार, शिंदे, शहा यांनी या मरणाच्या दारातील जुळ्या मुलांची ५० दिवस अहोरात्र काळजी घेऊन त्यांना जीवदान दिले़ विशेष म्हणजे मुलांना सोडून गेलेल्या या मातेचा शोध पोलिसांनी आपल्या पातळीवर खूप घेतला मात्र त्यांना अपयश आले़ अखेर पन्नास दिवसांनंतर या मातेचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले़पोलिसांनी या मातेला शोधून बुधवारी जिल्हा रुग्णालयात आणले़ या ठिकाणी आपली दोन्ही मुले जिवंत व गुटगुटीत असल्याचे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला़ मुलांना जीवनदान देणारे जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉक्टर, परिचारिका व पोलिसांचे आभार मानून तिच्या दोन्ही पिलांना कवेत घेऊन ती आपल्या घरी गेली़ या मातेला तिची मुले देताना परिचारिकांनाही भरूनआले होते़