शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

फळपीक विम्याच्या लाभापासून कळवण, सुरगाणा तालुका वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

या विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांतील सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे; ...

या विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांतील सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे; अन्यथा कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभोणा पश्चिम आदिवासी विकास समिती, तसेच तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी बांधवांनी दिला आहे. स्ट्रॉबेरी या फळपिकासाठी महाराष्ट्र शासनाने प्रायोगिकतत्त्वावर समाविष्ट केलेल्या गावांमध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तपोळा, लामज आणि पंचगणी वगळता राज्यभरातील इतर एकही स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या गावांचा समावेश विमा योजनेत करण्यात आलेला नाही, स्ट्रॉबेरी फळ लागवडीत कळवण तालुक्यात सुमारे ४०० हेक्टर इतकी लागवड दरवर्षी केली जाते. सोबतच सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा आणि दिंडोरी तालुक्यातदेखील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते, महाबळेश्वरच्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आदिवासी तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतले जाते.

गेल्या दहा वर्षांपासून कळवण, सुरगाणा व दिंडोरी येथील कमी- अधिक प्रमाणात अंदाजे ५० गावे स्ट्रॉबेरी फळाची लागवड करीत आहेत. या लागवडीसाठी मल्चिंग पेपर, ड्रिपिंग, अशा विविध योजना तालुका कृषी विभागाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना याआधी देऊ केल्या आहेत. असे असतानादेखील शासनाने पारित केलेल्या १८ जूनच्या फळपीक विमा योजनेच्या अध्यादेशामध्ये कळवणसह इतर तालुक्यांतील आदिवासी शेतकरी विमा योजनेपासून वंचित होताना दिसत असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कळवणसह इतर तालुक्यांतील स्ट्रॉबेरी उत्पादकांची हेक्टरी माहिती कृषी मंत्रालयाला कळवून विमा योजनेत सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा; अन्यथा कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन व निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा अभोणा पश्चिम आदिवासी विकास समिती, तसेच तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरीबांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. तालुका कृषी विभाग व कळवण तहसील विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रकाश बागूल, समिती मार्गदर्शक चेतन हिरे, उपाध्यक्ष भरत चव्हाण, कार्यकारी सदस्य उत्तम चव्हाण, दीपक दळवी, होनाजी चव्हाण, शिवराम पालवी, रमेश गावित, शांताराम बागूल, विनोद चव्हाण, अमित बोरसे, मुकेश गावित, एकनाथ बागूल आदींसह स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी देवराम पवार, नंदू गायकवाड, विकास कवर, यशवंत गवळी, चिंतामण पवार, सुरेश दळवी, पांडुरंग गायकवाड, साहेबराव गायकवाड, पार्वताबाई दळवी, अंबादास चव्हाण, अमृता चव्हाण, सुनील ठाकरे, सावळीराम चव्हाण, बंडू चव्हाण, एकनाथ पालवी, हिरामण पालवी, केशव गावित, पुंडलिक चव्हाण यांच्यासह सुकापूर, देवळीकराड, आमदार, वाडपाडा, लिंगामे व देवळीवणी येथील आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.