शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

फळपीक विम्याच्या लाभापासून कळवण, सुरगाणा तालुका वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

या विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांतील सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे; ...

या विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांतील सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे; अन्यथा कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभोणा पश्चिम आदिवासी विकास समिती, तसेच तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी बांधवांनी दिला आहे. स्ट्रॉबेरी या फळपिकासाठी महाराष्ट्र शासनाने प्रायोगिकतत्त्वावर समाविष्ट केलेल्या गावांमध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तपोळा, लामज आणि पंचगणी वगळता राज्यभरातील इतर एकही स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या गावांचा समावेश विमा योजनेत करण्यात आलेला नाही, स्ट्रॉबेरी फळ लागवडीत कळवण तालुक्यात सुमारे ४०० हेक्टर इतकी लागवड दरवर्षी केली जाते. सोबतच सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा आणि दिंडोरी तालुक्यातदेखील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते, महाबळेश्वरच्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आदिवासी तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतले जाते.

गेल्या दहा वर्षांपासून कळवण, सुरगाणा व दिंडोरी येथील कमी- अधिक प्रमाणात अंदाजे ५० गावे स्ट्रॉबेरी फळाची लागवड करीत आहेत. या लागवडीसाठी मल्चिंग पेपर, ड्रिपिंग, अशा विविध योजना तालुका कृषी विभागाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना याआधी देऊ केल्या आहेत. असे असतानादेखील शासनाने पारित केलेल्या १८ जूनच्या फळपीक विमा योजनेच्या अध्यादेशामध्ये कळवणसह इतर तालुक्यांतील आदिवासी शेतकरी विमा योजनेपासून वंचित होताना दिसत असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कळवणसह इतर तालुक्यांतील स्ट्रॉबेरी उत्पादकांची हेक्टरी माहिती कृषी मंत्रालयाला कळवून विमा योजनेत सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा; अन्यथा कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन व निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा अभोणा पश्चिम आदिवासी विकास समिती, तसेच तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरीबांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. तालुका कृषी विभाग व कळवण तहसील विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रकाश बागूल, समिती मार्गदर्शक चेतन हिरे, उपाध्यक्ष भरत चव्हाण, कार्यकारी सदस्य उत्तम चव्हाण, दीपक दळवी, होनाजी चव्हाण, शिवराम पालवी, रमेश गावित, शांताराम बागूल, विनोद चव्हाण, अमित बोरसे, मुकेश गावित, एकनाथ बागूल आदींसह स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी देवराम पवार, नंदू गायकवाड, विकास कवर, यशवंत गवळी, चिंतामण पवार, सुरेश दळवी, पांडुरंग गायकवाड, साहेबराव गायकवाड, पार्वताबाई दळवी, अंबादास चव्हाण, अमृता चव्हाण, सुनील ठाकरे, सावळीराम चव्हाण, बंडू चव्हाण, एकनाथ पालवी, हिरामण पालवी, केशव गावित, पुंडलिक चव्हाण यांच्यासह सुकापूर, देवळीकराड, आमदार, वाडपाडा, लिंगामे व देवळीवणी येथील आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.